किनवट प्रतिनिधी किनवट येथे संभाजी ब्रिगेडचा ५ वा वर्धापन दिन छत्रपती संभाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संथागार वृद्धाश्रमात फळे वाटप करून साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमाच्या वतीने अरुण आळणे यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ ची प्रतिमा देऊन स्वागत केले व संभाजी ब्रिगेडच्या ५ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत संभाजी ब्रिगेडने दिलेले योगदान खूप मोठे आहे.आज संभाजी ब्रिगेड पक्षाची स्थापना होवून ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. युगनायक अॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी आमच्या सारख्या लाखो युवकांना मन मनगट आणि मस्तक सशक्त करून राजसत्ता स्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाची ३०-नोव्हेंबर २०१६ रोजी स्थापना केली.आज त्याला ५ वर्ष पूर्ण झाले.असे मत यावेळी बोलतांना बालाजी सिरसाट यांनी व्यक्त केले. यावेळी संथागार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण आळणे अधिक्षक आकांक्षा आळणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट, सुमित माने, रितेश मंत्री ईश्वर गुर्लेवाड विशा
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com