Skip to main content

Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  राजेश पाटील किनवट, ता.१४: महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज(ता.१४) उत्साहात साजरी करण्यात आली.      जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली.आमदार भीमराव केराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. दरम्यान आत्मानंद सत्यवंश यांनी भीम गित सादर केले व ब्लु युनीटी बिट्स ग्रुपच्या मुलींनी सुंदर समुह नृत्य सादर केले तसेच याठीकाणी ॲड.दिलिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाणी बाॅटलचे वाटप केले. नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडूचे वाटप केले. गुरुस्वामी पवार यांनी शितपेयाचे वाटप केले, एका कार्यकर्त्याने थंड मठ्ठ्याचे वाटप केले.       बसस्थान...
Recent posts

तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शासन उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ...

प्रतिनिधि किनवट: मा. तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माहे एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत (एकूण २१ महिने) पुरवठा विभागामार्फत महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कालावधीत श्री. निलेश राठोड (निरीक्षण अधिकारी), श्री. सतीश सरनायक (पुरवठा निरीक्षक), श्री. मन्मथ मुगटकर, श्री. महेश चांदेकर श्री. श्रीकांत ठाकरे श्री. विनोद सोनकांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५८ गावांतील एकूण शेतकरी लाभार्थी शिधापत्रिका ३१४७ त्यावरील लाभार्थी संख्या ११५९७ असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.  या उपक्रमांतर्गत एकूण ₹४,०५,२३,०७७/- (रुपये चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर फक्त) इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला आहे.

महिंद्रा प्राइड क्लासरूम तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न; प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

किनवट : महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी नांदी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक अक्षय मेश्राम यांनी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी भागातील दुर्गम विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुलाखत कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहावेत, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रातील दोन विद्यार्थिनी—ऐश्वर्या पंढरीनाथ सेलूकर व प्रणाली मारोती मेश्राम—यांची केस स्टडी महिंद्रा प्राइडस...

किनवट उपकेंद्रात एम.एस.डब्ल्यू. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

​किनवट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे उपकेंद्र  कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे एम.एस.डब्ल्यू. (२०२४-२५) बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) डॉ. हणमंत कंधारकर लाभले होते. एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. ​याप्रसंगी बोलताना डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजकार्य ही केवळ पदवी नसून ती वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे." ​अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "किनवटसारख्या दुर्गम भागात राहून विद्यार्थ्यांनी केलेले क्षेत्रीय कार्य (Field...

जिल्हा परिषद सारखणी शाळेची नवोदय परीक्षेत गगन भरारी तीन विद्यार्थी प्रवेशपात्र

सत्यशोधक न्युज वार्ता/किनवट : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण व पारदर्शक परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणी येथील तीन विद्यार्थी प्रवेश पात्र होऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तसेच २८ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी हे ९० च्या वर ८ विद्यार्थी ८० च्या वर,9 विद्यार्थी 70 च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे.          जि. प. प्रा.शा.सारखणी शाळेत पात्र विद्यार्थी कु. स्वरा मेश्राम, कार्तिक चव्हाण ,केरबा खांडेकर यांचे आणि या यशाचे मानकरी , स्वतःला विद्यार्थी हिताकरिता  झोकुन देणारे, सुट्टीच्या दिवशी ही पूर्ण वेळ शाळा करणारे ध्येयवादी शिक्षक नरेंद्र कळंभे यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुनील भास्करवार, प्रमोद कांबळे (प्र.केंद्रप्रमुख), प्रविण पिल्लेवार , विनायक कुडमते, पुनाराम जाधव , भाऊराव उमरे , शरद वानखेडे, श्रीमती लता  ठक्कुरवार व श्रीमती विशाखा किन्नरवाड , आकाश गुज्जलवाड तसेच गावातील पालक शंकर चव्हाण, अनुपमा मेश्राम, संजय राठोड, मौफिक शेख, श्री मिसेवार ,श्री अमोल चव्हाण,यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे...

जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यांची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा.. नगरसेवक अभय नगराळे यांचे नगर परिषदेला निवेदन

किनवट:  आगामी काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.  या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची, समाजमंदिराची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा व अशा मागणीचे निवेदन नगरसेवक अभय नगराळे यांनी किनवट नगर परिषदेला दिले आहे. ​दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्यात शहरात ठिकठिकाणी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी नगर परिषदेने तातडीने  शहरांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महात्मा ज्योतिबा फुले पुतळा व समतानगर येथील समाज मंदिराची आकर्षक रंगरंगोटी करावी ​आणि पुतळा परिसरात स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत  ​जयंतीच्या काळात परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था आणि रोषणाई करण्याची मागणीही  ​नगरसेवक अभय नगराळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे जयंती उत्सव समिती आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात...

जागतिक महिला दिनानिमित्त संथागार येथे महिलांचा सन्मान

   किनवट: दि.८ जागतिक महिला दिनाचे पर्वावर संथागार येथील वृद्धाश्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाचा सन्मान करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन ॲड आकांक्षा आळणे यांनी केले होते.. या कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा अध्यक्षस्थानी किनवट नगरीच्या महिला नगराध्यक्षा श्रीमती सुजाताताई एन्ड्रलवार, होत्या. स्वागताध्यक्ष पदाची धुरा सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई बनसोड यांनी सांभाळली नगर परिषद उपनगराध्यक्ष हसन लाला ,युवानेते करण एन्ड्रलवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर मंचावर नगर सेविका ललीताताई मुनेश्वर, NGO श्रीमती संगिता पाटील, डॉ. प्रज्ञा बहादुरे, नगर सेविका प्रिती नेम्मनिवार, निलोफर भाटी, निकीता आयनेनिवार, ऐश्वर्या धात्रक, रेवती पवार, सपना मंडारे, हर्षावर्धना पाटील, रोहिणी मुनेश्वर, कांताताई सर्पे, निकीता कांबळे, पुनम सोनकांबळे,शशीकला कांबळे, आत्मानंद सत्यवंश ,बंडु गौरकर, शिवा साखरे,कांचन कांबळे, सपना कसबे, दिव्य...