किनवट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे उपकेंद्र कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे एम.एस.डब्ल्यू. (२०२४-२५) बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) डॉ. हणमंत कंधारकर लाभले होते. एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजकार्य ही केवळ पदवी नसून ती वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे." अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "किनवटसारख्या दुर्गम भागात राहून विद्यार्थ्यांनी केलेले क्षेत्रीय कार्य (Field...
सत्यशोधक न्युज वार्ता/किनवट : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण व पारदर्शक परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणी येथील तीन विद्यार्थी प्रवेश पात्र होऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तसेच २८ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी हे ९० च्या वर ८ विद्यार्थी ८० च्या वर,9 विद्यार्थी 70 च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. जि. प. प्रा.शा.सारखणी शाळेत पात्र विद्यार्थी कु. स्वरा मेश्राम, कार्तिक चव्हाण ,केरबा खांडेकर यांचे आणि या यशाचे मानकरी , स्वतःला विद्यार्थी हिताकरिता झोकुन देणारे, सुट्टीच्या दिवशी ही पूर्ण वेळ शाळा करणारे ध्येयवादी शिक्षक नरेंद्र कळंभे यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुनील भास्करवार, प्रमोद कांबळे (प्र.केंद्रप्रमुख), प्रविण पिल्लेवार , विनायक कुडमते, पुनाराम जाधव , भाऊराव उमरे , शरद वानखेडे, श्रीमती लता ठक्कुरवार व श्रीमती विशाखा किन्नरवाड , आकाश गुज्जलवाड तसेच गावातील पालक शंकर चव्हाण, अनुपमा मेश्राम, संजय राठोड, मौफिक शेख, श्री मिसेवार ,श्री अमोल चव्हाण,यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे...