किनवट ता.प्रतिनिधी गोरगरीब आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या येथील प्रसिद्ध 'अजिंक्य सेवाभावी संस्थे 'च्या वतीने येत्या २४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथील कलावती गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. विवाहबंधनात अडकणाऱ्या नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अजिंक्य सेवाभावी संस्थेने गेल्या सलग २० वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाहाचा हा स्तुत्य उपक्रम सुरू ठेवला आहे. संस्थेने आजवर तब्बल १२ हजारापेक्षा जास्त नवदाम्पत्यांना विवाहबंधनात अडकवून एक नवा इतिहास रचला आहे. आजच्या महागाईच्या काळात अनाठायी खर्चाला लगाम घालणे आणि वेळेची बचत करणे या उद्देशाने असे सामूहिक विवाह सोहळे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठीही काळाची गरज बनले आहेत. या विवाह सोहळ्यात नवविवाहितांना शुभाश...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा
तालुका प्रतिनिधी किनवट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. "किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्या...