Skip to main content

Posts

रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी जनजागृती

  राजेश पाटील किनवट: रस्त्यावरील अपघात प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे काहीही दोष नसलेले विनाकारण नागरिक मारल्या जात आहे त्यामुळे रोड सेफ्टी या कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र  रामनगर किनवट च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ही जनजागृती आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आपण घरातून बाहेर पडल्यावर आपलं कुटुंब आपली आतुरतेने वाट पाहत असते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी गाडी हळुवार चालवावी तसेच आपल्या आजूबाजूला देखील याबाबत जागृती करावी. यावेळी प्रा. संतोष पावार, प्रा. डॉ. पंजाब शेरे, संजय धोबे, सातरवार सर, प्रा. डॉ. आनंद भालेराव , सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, गावंडे सर, आहुजा भाई, ॲड. काळे सर, एकलारकर बंधु तसेच पोलीस बंधु सर नागरिकांनी जनजागृती केली.
Recent posts

नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे

  नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे अत्यंत कमी दरामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सगळ्या सोयी उपयुक्त अशा देण्यात आल्या आहे अत्याधुनिक व प्रशस्त या ट्रॅव्हल्सच इंटेरियर आहे सगळ्या सुविधा या गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत ही सेवा रुणवाल व भालेराव हे दोन तरुण यांनी किनवटकरांसाठी किनवट ते पुणे या दरम्यान हा प्रवास सोपा व्हावा येथील विद्यार्थी व नागरिक शिक्षणाच्या निमित्ताने व नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी त्यांना प्रवास करावा लागतो त्यांच्या वेळेची बचत व्हावी हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या ग्रामीण आदिवासी बहुल भागांमध्ये त्यांनी या ट्रॅव्हलची सेवा सुरू केली मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात त्यांचा प्रवास सुखदायक होण्यासाठी यांनी किनवट ते पुणे ही ट्रॅव्हल्स ची सेवा सुरू केली अत्यंत माफक दरात या ट्रॅव्हल्स तिकीट हे ठेवण्यात आलेला आहे नवीन काहीतरी करून दाखवण्याची उमेद या तरुणांनी स्वीकारली व किनवट करांच्या सेवेत ही ट्रॅव्हल्स सुरू करण्यात आलेली आहे या गाडीचे तिकीट बुक करण्यास...

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीच फिटणार नाहित - प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर

अहमदपूर/ गौतम कांबळे :- सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमरावाचे कार्य कधी मिटणार नाही, एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी डाॅ.बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहि असे गौरवोद्गार प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर यांनी काढले, गुंजोटी ता.अहमदपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुंजोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा युवा नेते श्री.राम चव्हाण , प्रमुख पाहुणे म्हणून प्रा, बालाजी आचार्य,  श्री.बालाजी चावरे व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमा पुजनाने झाली, तद्नंतर भव्य धम्म वंदना करुन ध्वजारोहण सरपंच श्री.राम चव्हाण यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे यथोचित सत्कार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती समीतीतर्फे करण्यात आला, प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर पुढे म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श वादी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राम चव्हाण यांनी पण सर्व महान व्यक्तीचे, समाजसुधारकांची जंयती उ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  राजेश पाटील किनवट, ता.१४: महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज(ता.१४) उत्साहात साजरी करण्यात आली.      जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली.आमदार भीमराव केराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. दरम्यान आत्मानंद सत्यवंश यांनी भीम गित सादर केले व ब्लु युनीटी बिट्स ग्रुपच्या मुलींनी सुंदर समुह नृत्य सादर केले तसेच याठीकाणी ॲड.दिलिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाणी बाॅटलचे वाटप केले. नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडूचे वाटप केले. गुरुस्वामी पवार यांनी शितपेयाचे वाटप केले, एका कार्यकर्त्याने थंड मठ्ठ्याचे वाटप केले.       बसस्थान...

तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शासन उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ...

प्रतिनिधि किनवट: मा. तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माहे एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत (एकूण २१ महिने) पुरवठा विभागामार्फत महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कालावधीत श्री. निलेश राठोड (निरीक्षण अधिकारी), श्री. सतीश सरनायक (पुरवठा निरीक्षक), श्री. मन्मथ मुगटकर, श्री. महेश चांदेकर श्री. श्रीकांत ठाकरे श्री. विनोद सोनकांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५८ गावांतील एकूण शेतकरी लाभार्थी शिधापत्रिका ३१४७ त्यावरील लाभार्थी संख्या ११५९७ असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.  या उपक्रमांतर्गत एकूण ₹४,०५,२३,०७७/- (रुपये चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर फक्त) इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला आहे.

महिंद्रा प्राइड क्लासरूम तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न; प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

किनवट : महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी नांदी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक अक्षय मेश्राम यांनी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी भागातील दुर्गम विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुलाखत कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहावेत, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रातील दोन विद्यार्थिनी—ऐश्वर्या पंढरीनाथ सेलूकर व प्रणाली मारोती मेश्राम—यांची केस स्टडी महिंद्रा प्राइडस...

किनवट उपकेंद्रात एम.एस.डब्ल्यू. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

​किनवट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे उपकेंद्र  कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे एम.एस.डब्ल्यू. (२०२४-२५) बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) डॉ. हणमंत कंधारकर लाभले होते. एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. ​याप्रसंगी बोलताना डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजकार्य ही केवळ पदवी नसून ती वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे." ​अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "किनवटसारख्या दुर्गम भागात राहून विद्यार्थ्यांनी केलेले क्षेत्रीय कार्य (Field...