Skip to main content

Posts

दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ किनवट-गोकुंदा कडकडीत बंद

  राजेश पाटील किनवट - दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दी. (२३ जुलै) किनवट व गोकुंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिल्लीतील लाठी हल्ल्याचे किनवट तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला किनवट शहरात अभूतपूर्व स्वयंस्फूर्त सर्वानी बंदम ध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत किनवट शहरासह गोकुंदा मधील व्यापारी वर्गाने या राज्यव्यापी बंद प्रतिसाद देत आपल्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांची कुलपे बंद ठेवून या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या शांततापूर्ण आणि अहिंसक आवाहनाला शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षानेही खंबीर पाठिंबा दर्शवला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक नेतृत्वानेही पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. नेत्य...
Recent posts

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा 📡📡 *सत्यशोधक न्यूज*

किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांचे महत्त...

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा

  किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांच...

राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

  किनवट, दि. ६ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, किनवट येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, किनवट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी,लोककल्याणकारी राज्यकारभार आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले.    कार्यक्रमात "जय जिजाऊ, जय शिवराय" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध पक्ष, संघटना व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी एकत्र येत शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष पर...

किनवटमध्ये २४ मे रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा 'अजिंक्य सेवाभावी संस्थे'चा २० वर्षांचा समाजसेवेचा वसा कायम !

   किनवट ता.प्रतिनिधी गोरगरीब आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या येथील प्रसिद्ध 'अजिंक्य सेवाभावी संस्थे 'च्या वतीने येत्या २४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथील कलावती गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. विवाहबंधनात अडकणाऱ्या नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अजिंक्य सेवाभावी संस्थेने गेल्या सलग २० वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाहाचा हा स्तुत्य उपक्रम सुरू ठेवला आहे. संस्थेने आजवर तब्बल १२ हजारापेक्षा जास्त नवदाम्पत्यांना विवाहबंधनात अडकवून एक नवा इतिहास रचला आहे. आजच्या महागाईच्या काळात अनाठायी खर्चाला लगाम घालणे आणि वेळेची बचत करणे या उद्देशाने असे सामूहिक विवाह सोहळे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठीही काळाची गरज बनले आहेत. या विवाह सोहळ्यात नवविवाहितांना शुभाश...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ​४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा

 ​   तालुका प्रतिनिधी ​किनवट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल  या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे. ​३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत ​ पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून  ​ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ​"किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्या...

दिल्लीतील अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात डॉ शारदा चोंडेकर यांचा कर्तृत्वगौरव

  तालुका प्रतिनिधी किनवट: दिल्लीतील पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ शारदा चोंडेकर यांचा साहित्यातील योगदानबाद्दल सन्मान करण्यात आला.त्या या पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या.  डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांची  काव्यमय स्पंदने उलगडणाऱ्या वर्णनाला बहिणाबाई चौधरी सभागृहातील उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या दोन दिवसात   ग्रंथ  दिंडी, चर्चा सत्रे, मुलाखती,कवियत्री महिला अधिकऱ्यांची कविसंमेलने रंगले .देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा' हे ब्रीदवाक्य घेऊन हे संमेलन दि ११व १२ एप्रिल २०२६ रोजी पार पडले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात   'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'द्वारे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन महाराष्...