Skip to main content

Posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ​४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा

 ​   तालुका प्रतिनिधी ​किनवट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल  या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे. ​३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत ​ पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून  ​ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ​"किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्या...
Recent posts

दिल्लीतील अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात डॉ शारदा चोंडेकर यांचा कर्तृत्वगौरव

  तालुका प्रतिनिधी किनवट: दिल्लीतील पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ शारदा चोंडेकर यांचा साहित्यातील योगदानबाद्दल सन्मान करण्यात आला.त्या या पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या.  डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांची  काव्यमय स्पंदने उलगडणाऱ्या वर्णनाला बहिणाबाई चौधरी सभागृहातील उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या दोन दिवसात   ग्रंथ  दिंडी, चर्चा सत्रे, मुलाखती,कवियत्री महिला अधिकऱ्यांची कविसंमेलने रंगले .देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा' हे ब्रीदवाक्य घेऊन हे संमेलन दि ११व १२ एप्रिल २०२६ रोजी पार पडले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात   'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'द्वारे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन महाराष्...

किनवट येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? २०० पुस्तक वाटप व वाचन आ.संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

  तालुका प्रतिनिधी किनवट: ४० वर्षापूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवरायांच्या अस्सल जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शिर्षकावरून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई व पत्नी बाबत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच नागपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात धीरेंद्र बागेश्वर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांबाबत अनैतीहासिक व खोटे वक्तव्य केल्याने अभ्यासू शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे किनवट तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व परिवर्तनादी व पुरोगामी विचाराच्या संघटनांच्या वतीने दि.२८-एप्रिल मंगळवारी रोजी सायंकाळी ४:३० वा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. तसेच किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे २०० पुस्तक वाटप व जाहीर वाचन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पठाण मोहम्मद हसन, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, माजी सभापती ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...

रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी जनजागृती

  राजेश पाटील किनवट: रस्त्यावरील अपघात प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे काहीही दोष नसलेले विनाकारण नागरिक मारल्या जात आहे त्यामुळे रोड सेफ्टी या कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र  रामनगर किनवट च्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ही जनजागृती आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आपण घरातून बाहेर पडल्यावर आपलं कुटुंब आपली आतुरतेने वाट पाहत असते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी गाडी हळुवार चालवावी तसेच आपल्या आजूबाजूला देखील याबाबत जागृती करावी. यावेळी प्रा. संतोष पावार, प्रा. डॉ. पंजाब शेरे, संजय धोबे, सातरवार सर, प्रा. डॉ. आनंद भालेराव , सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, गावंडे सर, आहुजा भाई, ॲड. काळे सर, एकलारकर बंधु तसेच पोलीस बंधु सर नागरिकांनी जनजागृती केली.

नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे

  नमस्कार किनवटकर रुणवाल ट्रॅव्हल्स आपल्या किनवट करांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहे अत्यंत सुखदायक आरामदायी प्रवास हा प्रवास किनवट ते पुणे असणार आहे अत्यंत कमी दरामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये सगळ्या सोयी उपयुक्त अशा देण्यात आल्या आहे अत्याधुनिक व प्रशस्त या ट्रॅव्हल्सच इंटेरियर आहे सगळ्या सुविधा या गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत ही सेवा रुणवाल व भालेराव हे दोन तरुण यांनी किनवटकरांसाठी किनवट ते पुणे या दरम्यान हा प्रवास सोपा व्हावा येथील विद्यार्थी व नागरिक शिक्षणाच्या निमित्ताने व नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी त्यांना प्रवास करावा लागतो त्यांच्या वेळेची बचत व्हावी हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या ग्रामीण आदिवासी बहुल भागांमध्ये त्यांनी या ट्रॅव्हलची सेवा सुरू केली मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात त्यांचा प्रवास सुखदायक होण्यासाठी यांनी किनवट ते पुणे ही ट्रॅव्हल्स ची सेवा सुरू केली अत्यंत माफक दरात या ट्रॅव्हल्स तिकीट हे ठेवण्यात आलेला आहे नवीन काहीतरी करून दाखवण्याची उमेद या तरुणांनी स्वीकारली व किनवट करांच्या सेवेत ही ट्रॅव्हल्स सुरू करण्यात आलेली आहे या गाडीचे तिकीट बुक करण्यास...

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीच फिटणार नाहित - प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर

अहमदपूर/ गौतम कांबळे :- सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमरावाचे कार्य कधी मिटणार नाही, एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी डाॅ.बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहि असे गौरवोद्गार प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर यांनी काढले, गुंजोटी ता.अहमदपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुंजोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा युवा नेते श्री.राम चव्हाण , प्रमुख पाहुणे म्हणून प्रा, बालाजी आचार्य,  श्री.बालाजी चावरे व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमा पुजनाने झाली, तद्नंतर भव्य धम्म वंदना करुन ध्वजारोहण सरपंच श्री.राम चव्हाण यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे यथोचित सत्कार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती समीतीतर्फे करण्यात आला, प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर पुढे म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श वादी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राम चव्हाण यांनी पण सर्व महान व्यक्तीचे, समाजसुधारकांची जंयती उ...