Skip to main content

Posts

आदिवासी महिला अत्याचाराप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यावर कारवाईची मागणी; 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' आक्रमक

   किनवट : किनवट लगत गोकुंदा (जि. नांदेड) येथील शासकीय विश्रामगृहात एका पीडित विधवा आदिवासी महिलेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, या घटनेत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना सहआरोपी करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' (महाराष्ट्र शाखा) च्या वतीने करण्यात आली आहे. दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी गोकुंदा (ता. किनवट) येथील शासकीय विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरात काम करत असताना बालाजी केंद्रे नावाच्या इसमाने पीडित महिलेसोबत अवाच्य भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच या विधवा आदिवासी महिलेला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिच्या असहायतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी किनवट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अखेर २२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्ह...
Recent posts

२ सप्टेंबरच्या रात्री दीड वाजता पोहचले मंडलवार आणि किनवटचा प्रभार बदलला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात, जगदीश मंडलवार यांच्याकडे कारभार

  (किनवट शहर प्रतिनिधी)  किनवट येथील दोन अत्यंत संवेदनशील प्रकरणांनंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिखली फाट्यावरील तेलंगणा पोलिसांवरील हल्ला आणि एका आदिवासी विधवा महिलेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास झालेला विलंब यामुळे वादग्रस्त ठरलेले किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नियंत्रण कक्षातील जगदीश मंडलवार यांच्याकडे किनवट पोलीस ठाण्याचा नवीन कार्यभार सोपवण्यात आला आहे.चिखली फाट्यावरील थरार आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हरविवारच्या संध्याकाळी तेलंगणा पोलिसांनी किनवटमधून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला तेलंगणाकडे घेऊन जात असताना चिखली फाटा येथे संशयित शेख जाफर याच्या नातेवाईकांनी तेलंगणा पोलिसांवर थेट हल्ला केला आणि आरोपीला हातकडीसह सोडवून पळवून नेले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या संशयिताला पुन्हा पकडून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या अत्यंत संवेदनशील घटनेदरम्यान तेलंगणा पोलिसांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या परीसरात हळहळ

   किनवट : मांडवी पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या २३ वर्षीय गणेश मदन चौफाडे याने गोकुंदा येथील नारायणनगर परिसरातील भाड्याच्या खोलीत जीवन संपवल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. गणेश हा सावरगाव तांडा येथील रहिवासी असून, तो पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणेश लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने नातेवाइकांच्या मदतीने त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पूर्ण केले. गणेशची यापूर्वी बीएसएफमध्ये निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने तेथून राजीनामा देऊन परतल्याची माहिती आहे. त्यानंतर तो होमगार्ड म्हणून सेवेत रुजू झाला आणि मांडवी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पोलिस भरतीची तयारी करता यावी, यासाठी गणेश गोकुंदा येथील नारायणनगर परिसरात भाड्याच्या खोलीत सचिन जगदीश पवार आणि भवन संतोष या दोन मित्रांसोबत राहत होता. २ सप्टेंबरच्या रात्री मित्रांसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर सर्वजण झोपले. त्यानंतर पहाटे गणेशने आत्महत्या केल्याचे मित्रांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची मा...

दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ किनवट-गोकुंदा कडकडीत बंद

  राजेश पाटील किनवट - दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दी. (२३ जुलै) किनवट व गोकुंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिल्लीतील लाठी हल्ल्याचे किनवट तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला किनवट शहरात अभूतपूर्व स्वयंस्फूर्त सर्वानी बंदम ध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत किनवट शहरासह गोकुंदा मधील व्यापारी वर्गाने या राज्यव्यापी बंद प्रतिसाद देत आपल्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांची कुलपे बंद ठेवून या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या शांततापूर्ण आणि अहिंसक आवाहनाला शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षानेही खंबीर पाठिंबा दर्शवला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक नेतृत्वानेही पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. नेत्य...

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा 📡📡 *सत्यशोधक न्यूज*

किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांचे महत्त...

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा

  किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांच...

राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

  किनवट, दि. ६ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, किनवट येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, किनवट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी,लोककल्याणकारी राज्यकारभार आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले.    कार्यक्रमात "जय जिजाऊ, जय शिवराय" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध पक्ष, संघटना व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी एकत्र येत शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष पर...