सत्यशोधक न्युज वार्ता/किनवट : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण व पारदर्शक परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणी येथील तीन विद्यार्थी प्रवेश पात्र होऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. तसेच २८ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी हे ९० च्या वर ८ विद्यार्थी ८० च्या वर,9 विद्यार्थी 70 च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. जि. प. प्रा.शा.सारखणी शाळेत पात्र विद्यार्थी कु. स्वरा मेश्राम, कार्तिक चव्हाण ,केरबा खांडेकर यांचे आणि या यशाचे मानकरी , स्वतःला विद्यार्थी हिताकरिता झोकुन देणारे, सुट्टीच्या दिवशी ही पूर्ण वेळ शाळा करणारे ध्येयवादी शिक्षक नरेंद्र कळंभे यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुनील भास्करवार, प्रमोद कांबळे (प्र.केंद्रप्रमुख), प्रविण पिल्लेवार , विनायक कुडमते, पुनाराम जाधव , भाऊराव उमरे , शरद वानखेडे, श्रीमती लता ठक्कुरवार व श्रीमती विशाखा किन्नरवाड , आकाश गुज्जलवाड तसेच गावातील पालक शंकर चव्हाण, अनुपमा मेश्राम, संजय राठोड, मौफिक शेख, श्री मिसेवार ,श्री अमोल चव्हाण,यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे...
जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यांची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा.. नगरसेवक अभय नगराळे यांचे नगर परिषदेला निवेदन
किनवट: आगामी काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची, समाजमंदिराची रंगरंगोटी करून परिसर स्वच्छ करावा व अशा मागणीचे निवेदन नगरसेवक अभय नगराळे यांनी किनवट नगर परिषदेला दिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्यात शहरात ठिकठिकाणी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी नगर परिषदेने तातडीने शहरांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,महात्मा ज्योतिबा फुले पुतळा व समतानगर येथील समाज मंदिराची आकर्षक रंगरंगोटी करावी आणि पुतळा परिसरात स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत जयंतीच्या काळात परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था आणि रोषणाई करण्याची मागणीही नगरसेवक अभय नगराळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे जयंती उत्सव समिती आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात...