Skip to main content

Posts

मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांसाठी विधी समितीचे टास्क फोर्स : सदस्यपदी पत्रकार ॲड.मिलिंद सर्पे

किनवट, दि. १५ : मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांसाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या पत्रान्वये तालुका विधी सेवा समितीने नुकतीच टास्क फोर्स ची  नेमणूक केली आहे.या फोर्स च्या सदस्यपदी पत्रकार ॲड.मिलिंद सर्पे व सामाजिक कार्यकर्ते दत्ता भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      मानव–वन्यजीव संघर्ष (HWC) प्रकरणांतील पीडितांना न्यायप्रवेश सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या पत्रान्वये ‘NALSA Scheme on Access to Justice for Victims of Human–Wildlife Conflict (HWC) 2025’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी  टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.     तालुका विधी सेवा समिती, किनवट अंतर्गत ता. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही टास्क फोर्स गठीत करण्यात आली. मानव–वन्यजीव संघर्षातील पीडितांना कायदेशीर मार्गदर्शन, नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समुपदेशन आदी बाबींमध्ये सहाय्य करणे हे या समितीचे प्रमुख उद...
Recent posts

10 केंद्रावर 123 सीसीटीव्हीच्या नियंत्रणात 3525 विद्यार्थी देणार 12 वीची परीक्षा # कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यास प्रशासन सज्ज

किनवट : मंगळवारी (ता.10) इयत्ता 12 वीच्या परिक्षेस प्रारंभ होणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली असून तालुक्यातील 10 केंद्रावर तीन हजार पाचशे पंचेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.      सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागातील किनवट व माहूर तालुक्यातील केंद्र संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (किनवट) , अभिजीत जगताप (माहूर) , पंचायत समिती , उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे , माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने (किनवट) , संतोष शेटकार (माहूर) , विस्तार अधिकारी ( पं) वसंत वाघमारे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , सहायक परिरक्षक शेषराव पाटील (माहूर) व समशीर खान (किनवट) यांची प्रमुख उपस्थिती होती.      जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) त...

किनवटच्या पत्रकारितेची धुरा आता महिला नेतृत्वाकडे; परवीन शेख यांची तालुकाध्यक्षपदी ऐतिहासिक निवड तर सचिवपदी बि. व्हि. वावळे

  ​किनवट (प्रतिनिधी):बि, व्हि, वावळे  बदलते नेतृत्व आणि प्रगतीचे पाऊल टाकत, किनवट येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत 'पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र' (तालुका किनवट) च्या अध्यक्षपदी तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार परवीन शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महिला नेतृत्वाकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने तालुक्यातील पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. ​निवडीनंतर बोलताना परवीन शेख यांनी, "तालुक्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू," असे आश्वासन दिले. ​मान्यवरांची उपस्थिती ​या निवडप्रसंगी राज्य अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर (नांदेड), राज्य संपर्कप्रमुख मारुती शिकारे सर आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष दीपक मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे किनवट तालुक्याच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. ​पत्रकार संघाच्या बळकटीसाठी खालीलप्रमाणे नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली: ​अध्यक्ष: परवीन शेख ​उपाध्यक्ष: पवन खराटे, वशिम शेख ​सचिव: बी. व्ही. वावळे ​सहसचिव: वैभव पडवाळ ​संघटक: राहुल पाटील, ज्ञानेश्वर चाटे...

बहुजन समाज पार्टी तातडीची बैठक

  नांदेड (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, पेरियार ई. व्ही. रामस्वामी नायकर, बिरसा मुंडा, अदी तमाम बहुजनवादी महापुरुषांच्या तसेच बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, आयरन लेडी बहन मायावतीजी यांच्या विचारावर काम करणारी बहुजन समाज पार्टीचे सर्व आजि-माजि पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांना कळविण्यात येते की, रविवार, दिनांक 25/01/2026 रोजी दुपारी ठीक 1.00 वाजता 'बीएसपी भवन', कावळे कॉम्प्लेक्स, वाय पॉईंट, गणेश नगर रोड, नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन, सदर बैठकीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा कार्यकारणी, युवा आघाडी, विद्यार्थ्यी आघाडी, महिला आघाडी, शहर कार्यकारिणी, बिव्हीएफ तसेच विविध भाईचारा कमिट्या गठीत करावयाच्या आहेत. अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.संतोष शिंदे व मराठवाडा झोन प्रभारी मा.मनीषभाऊ कावळे यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीच्या आजि-माजि पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सदर बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे.

सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयात बोली भाषेचा जागर

किनवट प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी  सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला. मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने  मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोल...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बळीराम पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रम

किनवट: प्रतिनिधी  बळीराम पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवट येथे मराठी भागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कल्लोळकार डॉ. वसंत राठोड यांचे 'बोलीभाषा व सद्यस्थिती'  या विषयावर तर प्रज्ञा घोडवाडीकर यांचे' किनवट परिसरातील बोलीचा वापर' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव,माजी संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड   यांचे' मराठी भाषा व लेखन कौशल्य'या विषयावर प्रा. डॉ.राजू मोतेराव यांचे आदिवासी लोककला व बोली या विषयाच्या अनुषंगाने  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज  यांच्या साहित्य संपदेवर आधारित 'जाणीव' भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'कथाकथन' या सदराखाली विद्यार्थ्यांनी रचलेल्या कथेचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनामध्ये मह...

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक महोत्सव समितीवर अमन कुंडगीर यांची नियुक्ती

 किनवट | प्रतिनिधी: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती, किल्ले वाफगाव यांच्या वतीने किनवट तालुका प्रतिनिधी म्हणून श्री. अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा आदेश समिती प्रमुख श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दिला. महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका पातळीवर समन्वय साधणे, जनसहभाग वाढविणे तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अमन कुंडगीर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमन कुंडगीर यांच्या सामाजिक सहभागाचा आणि कार्याचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महोत्सव अधिक व्यापक आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल किनवट तालुक्यातून अमन कुंडगीर यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.