राजेश पाटील किनवट, ता.१४: महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज(ता.१४) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली.आमदार भीमराव केराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. दरम्यान आत्मानंद सत्यवंश यांनी भीम गित सादर केले व ब्लु युनीटी बिट्स ग्रुपच्या मुलींनी सुंदर समुह नृत्य सादर केले तसेच याठीकाणी ॲड.दिलिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाणी बाॅटलचे वाटप केले. नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडूचे वाटप केले. गुरुस्वामी पवार यांनी शितपेयाचे वाटप केले, एका कार्यकर्त्याने थंड मठ्ठ्याचे वाटप केले. बसस्थान...
तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शासन उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ...
प्रतिनिधि किनवट: मा. तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माहे एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत (एकूण २१ महिने) पुरवठा विभागामार्फत महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कालावधीत श्री. निलेश राठोड (निरीक्षण अधिकारी), श्री. सतीश सरनायक (पुरवठा निरीक्षक), श्री. मन्मथ मुगटकर, श्री. महेश चांदेकर श्री. श्रीकांत ठाकरे श्री. विनोद सोनकांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५८ गावांतील एकूण शेतकरी लाभार्थी शिधापत्रिका ३१४७ त्यावरील लाभार्थी संख्या ११५९७ असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत एकूण ₹४,०५,२३,०७७/- (रुपये चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर फक्त) इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला आहे.