Skip to main content

Posts

जागतिक महिला दिनानिमित्त संथागार येथे महिलांचा सन्मान

   किनवट: दि.८ जागतिक महिला दिनाचे पर्वावर संथागार येथील वृद्धाश्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाचा सन्मान करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन ॲड आकांक्षा आळणे यांनी केले होते.. या कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा अध्यक्षस्थानी किनवट नगरीच्या महिला नगराध्यक्षा श्रीमती सुजाताताई एन्ड्रलवार, होत्या. स्वागताध्यक्ष पदाची धुरा सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई बनसोड यांनी सांभाळली नगर परिषद उपनगराध्यक्ष हसन लाला ,युवानेते करण एन्ड्रलवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर मंचावर नगर सेविका ललीताताई मुनेश्वर, NGO श्रीमती संगिता पाटील, डॉ. प्रज्ञा बहादुरे, नगर सेविका प्रिती नेम्मनिवार, निलोफर भाटी, निकीता आयनेनिवार, ऐश्वर्या धात्रक, रेवती पवार, सपना मंडारे, हर्षावर्धना पाटील, रोहिणी मुनेश्वर, कांताताई सर्पे, निकीता कांबळे, पुनम सोनकांबळे,शशीकला कांबळे, आत्मानंद सत्यवंश ,बंडु गौरकर, शिवा साखरे,कांचन कांबळे, सपना कसबे, दिव्य...
Recent posts

रमामाता प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

किनवट (ता.) — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजक्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रमामाता प्रतिष्ठानच्या वतीने भव्य संयुक्त जयंती महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 11 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी आकाश वि. आळणे  यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रवी सूर्यवंशी* यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सचिवपदी प्रतिकेश दि.ओंकार यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी निखिल ओंकार यांची निवड करण्यात आली असून सहकोषाध्यक्षपदी कपिल बलखंडे यांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबा साहेब आंबेडकर सार्वजनिक महोत्सव जयंतीच्या अध्यक्षपदी निखिल सर्पे तर सचिव म्हणून सिद्धार्थ भरणे , आल्फ्रेड ठमके यांची निवड...

  (राजेश पाटील ता. प्र.किनवट ) किनवट येथील सार्वजनिक संयुक्त महात्मा फुले  व राष्ट्रपित जोतीबा फुले जयंतीच्या अध्यक्षपदी निखिल सर्पे तर सचिव पदी सिद्धार्थ भरणे, आल्फ्रेड ठमके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणुन आकाश सर्पे, अनिकेत भरणे कोषाध्यक्षपदी संघर्ष घुले, सहकोषाध्यक्षपदी अनिल कांबळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस सल्लागार , मार्गदर्शक म्हणून मारोती मुनेश्वर, दादाराव कयापाक, ॲड. मिलींद सर्पे, रविकांत सर्पे, माधव कावळे, शंकर नगराळे, ॲड. किशोर मुनेश्वर, मनोहर पाटील, उमेश भरणे,विनोद भरणे, नितीन कावळे, यादवराव नगारे तथा युवक मंडळाचे कपील कावळे, सचिन हटकर, रवींद्र कांबळे, सुगत भरणे, सम्यक सर्पे, ब्रम्हानंद एडके, राजेश पाटील, शिलरत्न कावळे, सुरज भरणे, सचिन कावळे, अमोल इंगोले, प्रसेनजीत कावळे, गौतम पाटील, शुभम भवरे, बंटी भवरे, पंकज नगारे, लकी भरणे, प्रशांत ठमके, सुबोध परेकार, ॲड सम्राट सर्पे, रुपेश भवरे, स्वप्नील सर्पे आदी युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुबोध सर्पे यांनी केले तर आभार सुगत नगराळे यांनी मानले.  महात्मा जो...

किनवट उपकेंद्रात स्व. उत्तमराव राठोड यांची ९६ वी जयंती उत्साहात साजरी, AI तंत्रज्ञानाद्वारे घुमला स्व. उत्तमरावांचा आवाज

​किनवट : प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड संचलित कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (उपकेंद्र), किनवट येथे माजी खासदार स्व. उत्तमरावजी राठोड यांची ९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, किनवटच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित केले. ​ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत जाधव यांनी स्व. उत्तमराव राठोड यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "किनवटचा आज जो विकास आपल्याला दिसतो, त्यामागे उत्तमरावजींचा अत्यंत दूरदृष्टीकोन होता. त्यांनी घातलेल्या पायाभरणीमुळेच या दुर्गम भागाला विकासाची नवी दिशा मिळाली आहे." त्यांच्या या अभ्यासपूर्ण भाष्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी दाद दिली. ​AI तंत्रज्ञानाचा अनोखा प्रयोग या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर. डॉ. योगेश आंबुलगेकर यांनी या तंत्रज्ञानाद्वारे स्व. उत्तमराव राठोड यांचा आवाज पुनरुज्जीवित केला. केंद्राच्या भविष्यातील वाटचा...

किनवट शहरात आद्यक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन

 किनवट: १७ फेब्रुवारी २०२६ किनवट शहरात आद्यक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी करुन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी नगरसेवक मारोती मुनेश्वर,प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार,नगरसेवक राम नेम्मानीवार,नगरसेवक अनवर मिर्झा,शिवसेना शहर प्रमुख प्रशांतभाऊ कोंरडे,मातंग समाज संघटना अध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,साई तिरमनवार,राजु जोशी,रमेश राशर्लावार,नागनाथ भालेराव,माधव खेडेकर,रविकुमार दिसलवार,किशोर देवतळे,रवि उपरवार,प्रेस रिपोर्टर उल्हास आडे,विशाल कलगोटूवार,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,अशोक आरपेल्लीवार,देवन्ना कात्तेरवार,संतोष मारपवार,सुशांत राशर्लावार,चिन्ना माहूरकर,विकास मंत्रीवार,प्रफूल्ल इंगोले,आरुष माहूरकर,श्रेयश सावनपेल्लीवार,व्यंकटेश गायकवाड,महेश भालेराव,पवन माहूरकर,परमेश्वर मोकेनवार,लकी कोरलटवार,आयुष माहूरकर व अश्वित माहूरकर आदी उपस्थित होते...!!!

मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांसाठी विधी समितीचे टास्क फोर्स : सदस्यपदी पत्रकार ॲड.मिलिंद सर्पे

किनवट, दि. १५ : मानव–वन्यजीव संघर्षग्रस्तांसाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या पत्रान्वये तालुका विधी सेवा समितीने नुकतीच टास्क फोर्स ची  नेमणूक केली आहे.या फोर्स च्या सदस्यपदी पत्रकार ॲड.मिलिंद सर्पे व सामाजिक कार्यकर्ते दत्ता भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      मानव–वन्यजीव संघर्ष (HWC) प्रकरणांतील पीडितांना न्यायप्रवेश सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या पत्रान्वये ‘NALSA Scheme on Access to Justice for Victims of Human–Wildlife Conflict (HWC) 2025’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी  टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.     तालुका विधी सेवा समिती, किनवट अंतर्गत ता. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ही टास्क फोर्स गठीत करण्यात आली. मानव–वन्यजीव संघर्षातील पीडितांना कायदेशीर मार्गदर्शन, नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व समुपदेशन आदी बाबींमध्ये सहाय्य करणे हे या समितीचे प्रमुख उद...

10 केंद्रावर 123 सीसीटीव्हीच्या नियंत्रणात 3525 विद्यार्थी देणार 12 वीची परीक्षा # कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यास प्रशासन सज्ज

किनवट : मंगळवारी (ता.10) इयत्ता 12 वीच्या परिक्षेस प्रारंभ होणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली असून तालुक्यातील 10 केंद्रावर तीन हजार पाचशे पंचेवीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.      सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या अध्यक्षतेखाली उप विभागातील किनवट व माहूर तालुक्यातील केंद्र संचालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर (किनवट) , अभिजीत जगताप (माहूर) , पंचायत समिती , उप विभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे , माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने (किनवट) , संतोष शेटकार (माहूर) , विस्तार अधिकारी ( पं) वसंत वाघमारे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , सहायक परिरक्षक शेषराव पाटील (माहूर) व समशीर खान (किनवट) यांची प्रमुख उपस्थिती होती.      जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष राहूल कर्डिले , मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (मा) त...