दिल्लीतील अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात डॉ शारदा चोंडेकर यांचा कर्तृत्वगौरव
तालुका प्रतिनिधी किनवट:
दिल्लीतील पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ शारदा चोंडेकर यांचा साहित्यातील योगदानबाद्दल सन्मान करण्यात आला.त्या या पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या.
डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांची काव्यमय स्पंदने उलगडणाऱ्या वर्णनाला बहिणाबाई चौधरी सभागृहातील उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या दोन दिवसात ग्रंथ दिंडी, चर्चा सत्रे, मुलाखती,कवियत्री महिला अधिकऱ्यांची कविसंमेलने रंगले .देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा' हे ब्रीदवाक्य घेऊन हे संमेलन दि ११व १२ एप्रिल २०२६ रोजी पार पडले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'द्वारे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महाराणी ताराबाई यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र सदन, 'सरहद, पुणे' आणि राज्य शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी उपस्थित होते. निवासी आयुक्त आर. विमला यांनी उपस्थितांचे स्वागत केले, ‘सरहद’चे संजय नहार यांनी प्रास्तविक व समन्वयक लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.स्त्री-प्रशासकांनी लिहिलेल्या साहित्यातून प्रशासकीय व्यवस्थेवरही एक चांगला
संस्कार झाला तर ही व्यवस्था अधिक वत्सल, सृजनशील अन् सकारात्मक होऊ शकेल. त्यातूनच ती खऱ्या अर्थाने परिपूर्णतेने लोककल्याणकारी होईल, हे या संमेलनाचे वैचारिक अधिष्ठान होय .!
हे अधिष्ठान घेऊन नवी दिल्ली या सर्वोच्च राजकीय-प्रशासकीय सत्तेचा केंद्रबिंदू असणाऱ्या शहरात संपन्न झालेले साहित्य संमेलन हे लिहिणाऱ्या स्त्रीअधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन अशा प्रगल्भजाणिवांचा एक सुंदर आविष्कार आहे.या संमेलनाला महाराष्ट्र राज्य, दिल्ली केंद्र शासन आणि इतर राज्यांमधील कार्यरत महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव आनंददायी ठरेला.महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं हे पहिलं असं साहित्य संमेलन असल्यामुळे महाराष्ट्राच्या वाङ्मयमय इतिहासामधील ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.या अखिल भारतीय शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनातील सहभागाबद्दल व साहित्यिक योगदानबद्दल डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment