राजेश पाटील किनवट - दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दी. (२३ जुलै) किनवट व गोकुंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिल्लीतील लाठी हल्ल्याचे किनवट तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला किनवट शहरात अभूतपूर्व स्वयंस्फूर्त सर्वानी बंदम ध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत किनवट शहरासह गोकुंदा मधील व्यापारी वर्गाने या राज्यव्यापी बंद प्रतिसाद देत आपल्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांची कुलपे बंद ठेवून या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या शांततापूर्ण आणि अहिंसक आवाहनाला शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षानेही खंबीर पाठिंबा दर्शवला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक नेतृत्वानेही पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. नेत्य...
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com