Skip to main content

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ​४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा

 ​ 


 तालुका प्रतिनिधी ​किनवट :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल  या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे.


​३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत

​ पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून 

​ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

​"किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ सुजाता विनोद एंड्रलवार यांनी याप्रसंगी बोलताना केले आहे 


​नगराध्यक्षांच्या या पुढाकाराचे शहरभर कौतुक होत असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांना अनुसरून सुरू झालेली ही मोहीम किनवट शहराचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहनही नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी युवा नेते करण एंड्रलवार,मुख्याधिकारी मुगाजी काकडे, कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव  नगरसेवक सुरत सातुरवार,शेखर नेम्मानिवार,प्रीती धीरज नेम्मानीवार,अश्विनी जागरलावार,राम नेम्मानीवार,संतोष मरस्कोल्हे,मारोती मुनेश्वर,माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार,राजु जोशी,यांच्यासह रामनगर येथील नागरिक मोठया संख्येने या मोहिमेत सहभागी झाली होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...