Skip to main content

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 



 नांदेड :  ऑल इंडिया पँथर सेना आयोजित संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात  छत्रपती चौक याठिकाणी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिपप्रज्वलन करून  करण्यात आली.त्यानंतर लगेचच संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

       कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.विकास कदम हे होते. त्यांनी उद्घाटनपर भाषणात  संविधानावर प्रकाश टाकला.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमराव बुक्तरे यांनी केले.  तर प्रमुख वक्ते म्हणून राहुल पवार ( बुलढाणा ) हे होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व महापुरुषांच्या विचाराचा ठेवा म्हणजे भारतीय संविधान आहे.

       कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गणेश जोशी,ऍड.विजय गोणारकर हे होते.  

   जोशी पुढे बोलताना म्हणले की, संविधान कोण्या एका जाती किंवा धर्मासाठी नसून ते पूर्ण  भारतीयांसाठी  आहे.  तर प्रमुख पाहुणे म्हणून  लाभलेले माधवदादा जमदाडे , मनीष कावळे, डॉ. विठ्ठल पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजू सोनसळे, अक्षय जोंधळे, वैभव गायकवाड, अशोक वायवळे, दिनेश लोणे ,प्रा राज गायकवाड, डॉ. प्रविणकुमार सेलूकर, प्रा.राहुल पुंडगे ,अनिल शिरसे,  मधुकर झगडे, राहुल चिखलीकर, संदीप मांजरमकर,अनिल गायकवाड, अंकुश सावते, रमेश लोखंडे,  आकाश सूर्यवंशी,कुणाल सावते, निखिल गर्जे,  संजय बुक्तरे  व आदी संविधान प्रेमी  या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हिंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

     या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.