Skip to main content

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 



 नांदेड :  ऑल इंडिया पँथर सेना आयोजित संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात  छत्रपती चौक याठिकाणी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिपप्रज्वलन करून  करण्यात आली.त्यानंतर लगेचच संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

       कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.विकास कदम हे होते. त्यांनी उद्घाटनपर भाषणात  संविधानावर प्रकाश टाकला.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमराव बुक्तरे यांनी केले.  तर प्रमुख वक्ते म्हणून राहुल पवार ( बुलढाणा ) हे होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व महापुरुषांच्या विचाराचा ठेवा म्हणजे भारतीय संविधान आहे.

       कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गणेश जोशी,ऍड.विजय गोणारकर हे होते.  

   जोशी पुढे बोलताना म्हणले की, संविधान कोण्या एका जाती किंवा धर्मासाठी नसून ते पूर्ण  भारतीयांसाठी  आहे.  तर प्रमुख पाहुणे म्हणून  लाभलेले माधवदादा जमदाडे , मनीष कावळे, डॉ. विठ्ठल पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजू सोनसळे, अक्षय जोंधळे, वैभव गायकवाड, अशोक वायवळे, दिनेश लोणे ,प्रा राज गायकवाड, डॉ. प्रविणकुमार सेलूकर, प्रा.राहुल पुंडगे ,अनिल शिरसे,  मधुकर झगडे, राहुल चिखलीकर, संदीप मांजरमकर,अनिल गायकवाड, अंकुश सावते, रमेश लोखंडे,  आकाश सूर्यवंशी,कुणाल सावते, निखिल गर्जे,  संजय बुक्तरे  व आदी संविधान प्रेमी  या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हिंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

     या कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...