Skip to main content

गंधकुटीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रबोधनात्मक 'काव्यपौर्णिमा' रंगली. प्रत्येक पौर्णिमा काव्यपौर्णिमा : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान उपक्रम !

 



किनवट ( प्रतिनिधी ) :

गंधकुटी बुद्धविहार सिद्धार्थनगर गोकुंदा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 'काव्यपौर्णिमा' घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक रमेश मुनेश्वर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. गजानन सोनोने, सांगावाकार महेंद्र नरवाडे, कवी रुपेश मुनेश्वर, गायक सुरेश पाटील, कवी प्रकाश सोनवणे उपस्थित होते. उपस्थितांच्या बहारदार काव्य प्रबोधनाने  कवी संमेलनात रंगत आणली.




प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक  सुरेश पाटील यांनी वंदनगीत गाऊन कार्यक्रमास सुरवात केली. त्यानंतर राणीसाकार प्रा.गजानन सोनवणे यांनी.. 

" गातो मी गाणे निळ्या नभाचे

 आहे तराने नव्या दमाचे ... "

ही रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.


सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी -

 " घटनेच्या पानातून प्रतिष्ठा ही मिळतांना

रुढीवादी ग्रंथ मग चाळता कशाला "

ही रचना सादर करून संविधान जागृती केली.



कवी रुपेश मुनेश्वर यांनी - 

" इतिहासाचे पान पहा जगी ठरलया महान ,

माझ्या भिमरायाचं देनं भारताच संविधान"

 

संविधानचा गौरव करणारी रचना सादर करून दाद मिळविली.


बौध्दाचार्य अनिल उमरे यांनी -

" अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिले 

तू लाविलास दिवा क्रांतिबा ! क्रांतीची मशाल होतांना पाहिली "

ज्योतिरावाच्या कार्याची सुंदर रचना सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.



कवी प्रकाश सोनवणे यांनी -

" भिमाच्या जन्माने  जीवनाचे सोने झाले ,

भाग्य उजळले आता संपला अंधार "

ही सुंदर रचना  सादर केली.



सुनिता उमरे या कवयित्रीने 'आरक्षण ' नावाची रचना सादर केली तर कवयित्री सत्यभामा भगत (महामुने) ह्याने 'सावित्री ' या नावाची रचना सादर करून टाळ्या मिळविल्या. निवृत्ती नगराळे आणि भगवान घुले यांनी गीते सादर केली.



काव्य पौर्णिमेचा अध्यक्षीय समारोप करताना कवी रमेश मुनेश्वर यांनी -

"पोर्णिमेसम सुंदर असावे आयुष्य 

पौर्णिमेसम तेजोमय व्हावे आयुष्य "

 असा आयुष्यातील आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली.

बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.


या कार्यक्रमास रंजीत वाठोरे, अनिल कानिंदे, सुधीर पाटील, दिनेश खिल्लारे, छत्रपती रिंगणमोडे, राहुल घुले, जनार्दन भगत, सुमेध वाघमारे, सुखदेव कांबळे, प्रशांत शेरे, अनमोल गायकवाड, सुखदेव खिल्लारे, भोसले सर, रवी भालेराव, बालाजी वाढवे यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी रिंगनमोडे, केवळाबाई कानिंदे, अरूणाबाई धोटे, रुक्‍मीना गिमेकार, शिल्पा खिल्लारे, इंदूताई कानिंदे, विजयमाला कावळे, निर्मला घुले, छाया खिलारे आदी काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला