स्वारातिम उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये संविधान दिना निमित्त परिसंवाद
किनवट श. प्रतिनिधी:-
किनवट तालुक्यातील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये भारताला आज संविधान स्विकारून ७२ वर्ष झाली भारत देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून महासत्ते कडे वाटचाल करीत आहे या दिनाचे औचित्य साधून परिसंवाद कै.श्रीउत्तमराव राठोड स्वारातिम उपकेंद्रात परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परीसंवादास प्रमुख व्याख्याती म्हणुन संथागार वृद्धाश्रमाची अधिक्षीका आकांक्षा आळणे यांची उपस्थिती लाभली होती त्यांनी भारतीय राज्य घटना व मुलभुत हक्क या विषयावर व्याख्यान दिले तसेच आदीवासी संशोधन व समाजकार्य BSW च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की आपल्याला जेंव्हा भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्ये प्रदान करते तिथेच आपली राज्यघटना मूलभूत कर्तव्यांच्या मार्फत काही जबाबदाऱ्या आपल्या वर सोपवते त्या जबाबदाऱ्या पार पाडन प्रत्येक नागरिकांच कर्तव्य आहे तसेच संविधानाची मुल्य जोपासने , संविधानाचे या संविधानामुळेच देश कसा एकसंघ बनला आणि देशातील नागरीकांना कसे अधिकार प्रदान केले व न्याय दिला अशी माहीती आळणे यांनी दिली
या वेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शिवाजी गायकवाड व बी एस डब्ल्यु तथा आदीवासी संशोधनचे विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment