Skip to main content

स्वारातिम उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये संविधान दिना निमित्त परिसंवाद

 



किनवट श. प्रतिनिधी:-


किनवट तालुक्यातील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये भारताला आज संविधान स्विकारून ७२ वर्ष झाली भारत देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून महासत्ते कडे वाटचाल करीत आहे या दिनाचे औचित्य साधून  परिसंवाद कै.श्रीउत्तमराव राठोड स्वारातिम उपकेंद्रात परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परीसंवादास प्रमुख व्याख्याती म्हणुन संथागार वृद्धाश्रमाची अधिक्षीका आकांक्षा आळणे यांची उपस्थिती लाभली होती त्यांनी भारतीय राज्य घटना व मुलभुत हक्क या विषयावर  व्याख्यान दिले तसेच आदीवासी संशोधन व समाजकार्य BSW च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की आपल्याला जेंव्हा भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्ये प्रदान करते तिथेच आपली राज्यघटना मूलभूत कर्तव्यांच्या मार्फत काही जबाबदाऱ्या आपल्या वर सोपवते त्या जबाबदाऱ्या पार पाडन प्रत्येक नागरिकांच कर्तव्य आहे तसेच संविधानाची मुल्य जोपासने , संविधानाचे या संविधानामुळेच देश कसा एकसंघ बनला आणि देशातील नागरीकांना कसे अधिकार प्रदान केले व न्याय दिला अशी माहीती आळणे यांनी दिली

या वेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शिवाजी गायकवाड व बी एस डब्ल्यु तथा आदीवासी संशोधनचे विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...