Skip to main content

स्थानिक विकास निधीतून दिव्यांगांच्या राखीव निधी दहा लक्ष रुपये खर्च करा-राज माहुरकर

 



किनवट प्रतिनिधी

जागतिक अपंग दिनानिमित्त दिनांक 03/12/2021 रोजी अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने आमदार भीमराव केराम यांना अर्ज देऊन राखीव निधी 10 लक्ष रुपये खर्च करण्या संबंधि दुसऱ्यांदा विनंती अर्ज दिला.

किनवट माहूर तालुका हा अतिशय डोंगराळ व आदिवासी तालुका म्हणून शासनदरबारी ओळख आहे अशा या विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम हे निवडून आल्याने सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत यामध्ये कोरोणा काळाने तर भल्याभल्यांना जेरीस आणले होते व आजही परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी बराच काळ लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये अपंग बांधवांचे हाल तर न बोललेले बरे अशी अवस्था झाली असताना गेल्या वर्षापासून राज माहुरकर लढत असून बऱ्याच पैकी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाले असले तरी शासन निर्णयानुसार स्थानिक विकास निधी मधील राखीव 10 लक्ष रुपये गेल्यावर्षी मागणी करून मिळाली नसल्याचे अर्जात नमूद केले आहे परंतु या वर्षी तरी आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी दिव्यांगांच्या राखीव 10 लक्ष रुपये येणाऱ्या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगावर खर्च करावा अशी अपेक्षा संघटनेचे सचिव यांनी अर्जाद्वारे व्यक्त केली

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते