Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जलधारा ३३ केव्ही उपकेंद्राला ५ मेगावॅटचे रोहित्र मिळाल्याने शेतीसह ९ गावांचा विज पुरवठा पुर्ववत

 


किनवट प्रतिनिधी: 

किनवट तालुक्यातील जलधारा सर्कल मधील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ मेगावॅटचे रोहित्र जळाल्याने ९ गावांचा विज पुरवठा  मागील एक महिण्यापासून खंडित झाला होता,  खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून एका दिवसात हा प्रश्न निकाली काढून  शेतीसह ९ गावांचा विजेचा प्रश्न मिटला असुन खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले जात आहेत.


खरिपानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली, गहू , हरभरा पीक घेण्याची लगबग सुरू आहे, शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा जलधारा सर्कल मधिल सावरगाव, सावरगावतांडा, मांजरीमाथा,वाघदरी,रिठा, रिठातांडा, नंदगाव, नंदगावतांडा, या   गावांचा विज पुरवठा जलधारा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ मेगावॅटचा क्षमतेचा शेती पंपाचा पॉवर ट्रान्सफॉर्मर  जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून खंडित झाला होता.

 त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारू करताच तात्काळ खासदार पाटिल यांनी त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी वरीष्ठ पातळी वरून महावितरणची सर्व यंत्रणा कामाला लावली.

 खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः नांदेड जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून ९ गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावर महावितरण  विभागाने तातडीने कारवाई करून  ५  मेगावॅट क्षमतेचे पॉवर टान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतीसह गावांचा विदुयत पुरवठा सुरळीत झाला आहे.

एैरवी सरकारी काम आणि महिनाभर थांब अशी परिस्थिती असतांना सर्व सामान्य माणसाला दप्तर दिरंगाई अधिकार्डयांच्या हेळसांड पणाचा सामना करावा लागतो परंतु लोकप्रतिनिधींनी दखल घेताच सर्व यंत्रणा गतिमान झाल्याचा प्रत्यय आला , यामुळे जलधारा सर्कल मधील ९ गावातील एैन खरीपाच्या हंगामात शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागून  विज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे, त्यांच्या यंत्रणेचे कौतुक करून आभार मानले आहेत. शेती व शेतकरी यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले खासदार हेमंत पाटील प्रामुख्याने शेती – शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्य देऊन सोडवत असतात .




Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...