Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जलधारा ३३ केव्ही उपकेंद्राला ५ मेगावॅटचे रोहित्र मिळाल्याने शेतीसह ९ गावांचा विज पुरवठा पुर्ववत

 


किनवट प्रतिनिधी: 

किनवट तालुक्यातील जलधारा सर्कल मधील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ मेगावॅटचे रोहित्र जळाल्याने ९ गावांचा विज पुरवठा  मागील एक महिण्यापासून खंडित झाला होता,  खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून एका दिवसात हा प्रश्न निकाली काढून  शेतीसह ९ गावांचा विजेचा प्रश्न मिटला असुन खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले जात आहेत.


खरिपानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली, गहू , हरभरा पीक घेण्याची लगबग सुरू आहे, शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा जलधारा सर्कल मधिल सावरगाव, सावरगावतांडा, मांजरीमाथा,वाघदरी,रिठा, रिठातांडा, नंदगाव, नंदगावतांडा, या   गावांचा विज पुरवठा जलधारा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ मेगावॅटचा क्षमतेचा शेती पंपाचा पॉवर ट्रान्सफॉर्मर  जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून खंडित झाला होता.

 त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारू करताच तात्काळ खासदार पाटिल यांनी त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी वरीष्ठ पातळी वरून महावितरणची सर्व यंत्रणा कामाला लावली.

 खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः नांदेड जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून ९ गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावर महावितरण  विभागाने तातडीने कारवाई करून  ५  मेगावॅट क्षमतेचे पॉवर टान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतीसह गावांचा विदुयत पुरवठा सुरळीत झाला आहे.

एैरवी सरकारी काम आणि महिनाभर थांब अशी परिस्थिती असतांना सर्व सामान्य माणसाला दप्तर दिरंगाई अधिकार्डयांच्या हेळसांड पणाचा सामना करावा लागतो परंतु लोकप्रतिनिधींनी दखल घेताच सर्व यंत्रणा गतिमान झाल्याचा प्रत्यय आला , यामुळे जलधारा सर्कल मधील ९ गावातील एैन खरीपाच्या हंगामात शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागून  विज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे, त्यांच्या यंत्रणेचे कौतुक करून आभार मानले आहेत. शेती व शेतकरी यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले खासदार हेमंत पाटील प्रामुख्याने शेती – शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्य देऊन सोडवत असतात .




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...