Skip to main content

शेतातील वीज जोडणी सुरळीत करा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल -अजय कदम पाटील


  किनवट प्रतिनिधी/ सय्यद नदीम  :

जगभरात कोरोना संक्रमनाने आधीच आर्थिक संकटात शेतकरी अडकला त्यातच अस्मानी संकटाने अवेळी आलेल्या पावसाने शेतकरी यांचे कंबरडे मोडले बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे .

रब्बी हंगामात हरभरा ,गहू या पिकांची लागवड केली असून बीज अंकुर फुटण्याच्या अवस्थेत आहे. या पिकांना जलस्त्रोता द्वारे पाणी देणे चालू असून अचानक पूर्वसूचना न देता विजतोडणी केली जात आहे.



  शेतकऱ्यांची वीज पंपाची वीज तोडणी केल्यास लोकशाही मार्गाने महावितरण समोर आंदोलन करू असा इशारा अजय कदम पाटील तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला असून तहसीलदार मार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना देण्याचे निवेदनात उल्लेख आहे.

शेतकऱ्यांचा महावितरणने सहानुभूति पूर्वक विचार करावा व वीज जोडणी सुरळीत चालू करून सहकार्य करावे असे स्पष्ट निवेदनात असून यावर सुनील चव्हाण पाटील , शिवा पाटील सोळंके,सम्यक सर्पे ,धनंजय कराळे, परमेश्वर घाडगे ,पप्पू  पुटवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...