Vi mobile tower |
राजेश पाटील
किनवट शहर बातमीदार:
सध्या मोबाईल नेटवर्कचे जाळे दिवसेंदिवस वाढतच चालले असुन या टावर मधुन निघणाऱ्या रेडीएशन लहरी मुळे मानवी शरीरावर बिकट परिणाम होत आहे खैरोद्दीन मार्ग येथे भारत नागरगे यांचा कॉम्पलेक्स आहे याच छतावर वी मोबाईल कंपनीचे टावर बसवण्यात येणार आहे परंतु या टावर उभारण्या विरोधात जागरूक समाज सेवक शेख मुशेब शेख युसुफ व तेथील स्थानिक रहीवाशांनी आक्षेप घेतला आहे त्यांचे म्हणने आहे की या वी मोबाईल टावर मुळे लहान बालके व वयोवृद्ध लोकांना टावर पासुन निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी मुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे म्हणुन हे टावरचे काम त्वरीत थांबवावे व लोकांच्या आजारांचे संरक्षण करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले .
या निवेदनवर शेख मुशेब शेख युसुफ, अनवर म. सुलेमान, मोहसीन, सुदाम मुनेश्वर, शोएब शेख, अली चाऊस, योगेश बिरमुर, समीर शाह, जुनेद खान, शेख इब्राहीम, शेख जोहेब, शादाब शेख, म. शारीक, सय्यद नदीम, शेख सोहेल, अरस लान खान, सईद अरबाज, सय्यद मुजीबोदिन, एजाज म. इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment