Skip to main content

वी कंपनीचे मोबाईलचे टावर बसवण्यासाठी नागरीकांचा आक्षेप


Vi mobile tower


राजेश पाटील 

किनवट शहर बातमीदार:


सध्या मोबाईल नेटवर्कचे जाळे दिवसेंदिवस वाढतच चालले असुन या टावर मधुन निघणाऱ्या रेडीएशन लहरी मुळे मानवी शरीरावर बिकट परिणाम होत आहे खैरोद्दीन मार्ग येथे भारत नागरगे यांचा कॉम्पलेक्स आहे याच छतावर वी मोबाईल कंपनीचे टावर बसवण्यात येणार आहे परंतु या टावर उभारण्या विरोधात जागरूक समाज सेवक शेख मुशेब शेख युसुफ व तेथील स्थानिक रहीवाशांनी आक्षेप घेतला आहे त्यांचे म्हणने आहे की या वी मोबाईल टावर मुळे लहान बालके व वयोवृद्ध  लोकांना टावर पासुन निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी मुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे म्हणुन हे टावरचे काम त्वरीत थांबवावे व लोकांच्या आजारांचे संरक्षण करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले .

या निवेदनवर शेख मुशेब शेख युसुफ, अनवर म. सुलेमान, मोहसीन, सुदाम मुनेश्वर, शोएब शेख, अली चाऊस, योगेश बिरमुर, समीर शाह, जुनेद खान, शेख इब्राहीम, शेख जोहेब, शादाब शेख, म. शारीक, सय्यद नदीम, शेख सोहेल, अरस लान खान, सईद अरबाज, सय्यद मुजीबोदिन, एजाज म. इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...