किनवट स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याचा डॉ. मृणाल जाधव यांचा मानस ३४ किलो प्लास्टिक जप्त; तहसिलदार यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात
किनवट:- प्लास्टिक बंदीसंदर्भात येथीलपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार किनवट शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांविरूध्द पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने येथील आठवडी बाजारात अचानक धडक कार्यवाही केली. भाजी मंडई व परिसरातील सुमारे १५० ते २०० आस्थापनांची तपासणी करून आक्षेपार्ह आढळलेले ३४ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे सिंगल युज प्लास्टिक चा वापर न करण्याची सक्त ताकीद देऊन, पुढे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज उत्पादन व वापर) नियम, २००६ द्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनदेखील या कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे नुकसान वाढतच १२ बाय ८ इंचापेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीच्या वेष्टनावर माहिती टाकावी, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामध्ये अविघटनश