Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा

 


संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, सचिव रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड तालुका किनवटच्या वतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.



 मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव राजेश पाटील, उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, सदस्य शेख खय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहू कुमार शिंदे, महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, वास्तववेदचे संपादक राजाभाऊ जाधव, फिरोज मुजावर, पठाण आय. एफ. आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने दिवंगत पत्रकार मारोती गव्हाळे यांना श्रद्धांजली वाहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या लहान मुलीस आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार प्रताप भोस, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, भागवत काळे, सुनील ठाकरे, संदेश कांबळे, राजु गायकवाड, अशोक गायकवाड, शैलेश कोरडे, राज नप्ते, मैनोदीन सौदागर, गजानन नवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी शाळेला घड्याळ भेट देऊन पत्रकार दिन साजरा केला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ फलटण कार्यकारिणीच्या वतीने  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष संतोष बिचुकले व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव सर्व जिल्ह्यामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...