Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा

 


संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, सचिव रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड तालुका किनवटच्या वतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.



 मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव राजेश पाटील, उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, सदस्य शेख खय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहू कुमार शिंदे, महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, वास्तववेदचे संपादक राजाभाऊ जाधव, फिरोज मुजावर, पठाण आय. एफ. आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने दिवंगत पत्रकार मारोती गव्हाळे यांना श्रद्धांजली वाहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या लहान मुलीस आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार प्रताप भोस, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, भागवत काळे, सुनील ठाकरे, संदेश कांबळे, राजु गायकवाड, अशोक गायकवाड, शैलेश कोरडे, राज नप्ते, मैनोदीन सौदागर, गजानन नवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी शाळेला घड्याळ भेट देऊन पत्रकार दिन साजरा केला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ फलटण कार्यकारिणीच्या वतीने  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष संतोष बिचुकले व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव सर्व जिल्ह्यामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला