Skip to main content

शेती मालावरील वायदेबंदी न उठवील्यास २३ जानेवारी २०२२ पासून सेबीच्या कार्यालया समोर बेमुदत आंदोलन

 


नांदेड प्रतिनिधी:-०९ जाने

शेतीमालावरील वायदेबंदी न उठवील्यास मुंबई येथील सेबीच्या कार्यालया समोर आंदोलनात संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटना सहभागी होतील अशा आशयाचे निवेदन पत्र मा. पंतप्रधान भारत सरकार दिल्ली यांना मा.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत देण्यात येत आहे .

सविस्तर वृत असे कि २० डिसेंबर २०२२ रोजी  सरकार द्वारे एक आदेश काढण्यात आला तो शेतकरी, व्यापारी , उद्योजक यांच्यावर अन्यायकारक व नुकसान कारक आहे म्हणुन स्वंतत्र भारत पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकरी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु आहे हा आदेश शेतकऱ्यांच्या हिताचा नाही तो मारक आहे असे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीने कळवण्यात आले .

सदरील निवेदनावर गुणवंत पा. हंगरेकर ( माजी प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना), अॅड धोंडीबा पवार जिल्हाध्यक्ष स्वंतत्र भारत पार्टी), शिवाजीराव शिंदे ( शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष) आर. पी. कदम( उपाध्यक्ष शेतकरी संघटना), माधव शिंदीकर उपाध्यक्ष स्व. भा. पा.), व्यंकटराव वडजे, विठ्ठलरेड्डी पुल्लागोर, लिंगोजी शिंदे, शिवराज शिंदे, मोहन गुडमलवार, अभी. नरसा रेड्डी याल्लावार, गोवीदराव लोढे, रामलीसन कदम, बाबुराव चव्हाण, वसंत जवादवार, रामराव कोंढे, गणेश कदम, शिवराज थडीसावळेकर, शिवाजी टेंभुर्णीकर, भीमराव हसाळीकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...