Skip to main content

तालुका क्रिडा अधिकारी गुरुदीप संधु यांना सेवापूर्तीसाठी निरोप

 

ता. प्र. किनवट:-

किनवट येथे प्रदिर्घ सेवेतुन संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा घेण्यात आला.श्री स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातुर येथे 1992 साली क्रीडा आधिकारी म्हणुन रुजु झाले होते येथुन आपल्या सेवेला सुरुवात केली होती तर ते सध्या जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय नांदेड मध्ये किनवट तालुका क्रीडा अधिकारी म्हणुन किनवटला कार्यरत होते आणि त्यांची आपली एकुन 32 वर्ष सेवा दिली .ते प्रदिर्घ सेवेतुन.31 डिसेंबर 2022 रोजी निवृत झाले.त्यांचा किनवट क्रीडा समिती किनवट आयोजित  दि.08 जानेवारी 2023 वार रविवार सकाळी 11:30 वा.  क्रीडा संकुल इंनडोर हाॅल किनवट येथे घेण्यात आला.क्रार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद तिरमनवार हे होते तर प्रमुख पाहुने श्री.हैदर शेख सर ..प्रमुख उपस्थिती श्री.तांदळे प्रेम सर(क्रीडा संयोजक ,किनवट), काँग्रेस सरचिटणिस श्री गिरीष नेम्मानीवार ( राष्ट्राय खेळाडु व्हालीबाॅली) श्री.पठाण जुम्माखाँ , श्री.संदीप इसाई सर,श्री,रामराव राठोड सर तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर जी राठोड सरांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन श्री .संतोष मुंढे सर,श्री .सय्यद फराहन सर,श्री संदिप एशिमोड सर श्री.करण मुंढे सर यानी केले होते.श्री शेख हैदर सर,श्री,तांदळे सर,श्री गिरीष नेम्मानिवार श्री.पठाण सर,श्रीरामराव राठोड सर श्री संतोष मुंढे सर श्री गुरुदीपसिंघ संधु सरांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना बद्दल व त्यांच्या  केलेल्या कार्यांचा अलेख कार्यक्रमाला उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडु समोर ठेवला.तर संधु सरांनी आपल्या भाषणात आपल्या कार्याचा अनुभव कार्यक्रमात जमलेल्या खेळाडु व क्रीडा शिक्षका समोर ठेवला. तर अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.मुंकुद तिरमनवार यांनी संधु सरांनी क्रीडा संकुलची स्थापना करण्यापासुन किनवट तालुक्यातील खेळाडुंना राज्यस्तर पोहचवण्या मधिल त्यांचे योगदान तसेच त्यांचा मनमिळाऊ स्वभाव प्रेमळवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लेखाजोखा कार्यक्रमाला जमलेल्या क्रीडाशिक्षक व खेळाडु समोर ठेवला.आणि आतापर्यंतच्या सहकार्या बद्दलसंधु सरांचे धन्यवाद केले व पुढे सहकार्य कराल आशी आशा संधु सरांकडे केली तर आभार श्री .रामराव राठोड यानी केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला