Skip to main content

अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर झालेच पाहिजे अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेऊन रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका-अमन कुंडगीर



किनवट/प्रतिनिधीः राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या भारत देशाच्या प्रेरणास्थान आहेत. मोघल, निजामशाहीत व हिंदू संस्कृतीवर होणार्‍या हल्ल्यावर त्यांनी लगाम लावला होता. हिंदू संस्कृतीत त्यांनी प्राण फुंकले, त्यांनी अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरे बांधली, मंदिराचे पुर्ननिर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. अशा थोर राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे, अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेवून रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे सोशल मिडया प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी दिला. 
     अहमदनगर जिल्ह्याला राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. मा.खा.डॉ.विकास महात्मे, आ.गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून शिंदे सरकारने लवकरच नामांतर करू अशी घोषणा केली आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक अडथळा निर्माण करीत आहेत. येणार्‍या काळात या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व समाज बांधवांना सोबत घेवून मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे अमन कुंडगीर यांनी सांगीतले. 
    या आंदोलन यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात खेडयापाड्यात जावून समाजातील लोकांच्या भेटी व बैठका घेवून संघटनात्मक कार्य करीत आहेत. मोठे संघटन उभारून या आंदोलनासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...