Skip to main content

किनवट स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याचा डॉ. मृणाल जाधव यांचा मानस ३४ किलो प्लास्टिक जप्त; तहसिलदार यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात




किनवट:- प्लास्टिक बंदीसंदर्भात येथीलपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार किनवट शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांविरूध्द पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने येथील आठवडी बाजारात अचानक धडक कार्यवाही केली. भाजी मंडई व परिसरातील सुमारे १५० ते २०० आस्थापनांची तपासणी करून आक्षेपार्ह आढळलेले ३४ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे सिंगल युज प्लास्टिक चा वापर न करण्याची सक्त ताकीद देऊन, पुढे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज उत्पादन व वापर) नियम, २००६ द्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनदेखील या कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे नुकसान वाढतच


१२ बाय ८ इंचापेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीच्या वेष्टनावर माहिती टाकावी, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामध्ये अविघटनशील प्लास्टिक कचर्याचे प्रमाण मोठे आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे शहरातही घनकचरा हाताळण्यामध्ये विविध समस्या निर्माण होत असून हा कचरा जाळल्याने विविध आजार निर्माण होतात. हा प्लास्टिक कचरा नाले व गटारात अडकल्याने शहरांमध्ये नालीतील घाण रस्त्यावर वाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


सरकारने प्लास्टिक पिशव्या बंदी केल्याचे विक्रेते सांगत आहेत. तरीही लोक पिशव्या मागत असल्याने व ज्यांच्याकडे जुन्या पिशव्यांचा साठा आहे. ते प्लास्टिक पिशव्या आजही ग्राहकांना देत आहेत. फळ, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्याकडून पिशव्या देणे सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास, फ्लेक्स, तोरण अशा वस्तूंचा वापर करण्यामध्ये राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्लास्टिकपासून बनविलेल्या पिशव्यांची किमान जाड़ी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी व आकार दिली.


तरीही शहरातील दुकाने, आस्थापना, हॉटेल, खानावळ, चायनीज हॉटेल, बियर शॉप, मटण- चिकनचे दुकान, मासळी बाजार, बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केलेला आढळत असल्यामुळे पालिकेच्या पथकाने सोमवारी अचानक धडक कार्यवाही करून ३४ किलो सिंगल युजप्लास्टिक जप्त केले. यापुढेही पथकाची कार्यवाही चालूच राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यापुढे आक्षेपार्ह प्लास्टिकच्या वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती  पथक प्रमुख चंद्रकांत दुधारे यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला