किनवट स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याचा डॉ. मृणाल जाधव यांचा मानस ३४ किलो प्लास्टिक जप्त; तहसिलदार यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात
किनवट:- प्लास्टिक बंदीसंदर्भात येथीलपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार किनवट शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांविरूध्द पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने येथील आठवडी बाजारात अचानक धडक कार्यवाही केली. भाजी मंडई व परिसरातील सुमारे १५० ते २०० आस्थापनांची तपासणी करून आक्षेपार्ह आढळलेले ३४ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे सिंगल युज प्लास्टिक चा वापर न करण्याची सक्त ताकीद देऊन, पुढे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज उत्पादन व वापर) नियम, २००६ द्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनदेखील या कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे नुकसान वाढतच
१२ बाय ८ इंचापेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीच्या वेष्टनावर माहिती टाकावी, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामध्ये अविघटनशील प्लास्टिक कचर्याचे प्रमाण मोठे आहे.
प्लास्टिक कचऱ्यामुळे शहरातही घनकचरा हाताळण्यामध्ये विविध समस्या निर्माण होत असून हा कचरा जाळल्याने विविध आजार निर्माण होतात. हा प्लास्टिक कचरा नाले व गटारात अडकल्याने शहरांमध्ये नालीतील घाण रस्त्यावर वाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारने प्लास्टिक पिशव्या बंदी केल्याचे विक्रेते सांगत आहेत. तरीही लोक पिशव्या मागत असल्याने व ज्यांच्याकडे जुन्या पिशव्यांचा साठा आहे. ते प्लास्टिक पिशव्या आजही ग्राहकांना देत आहेत. फळ, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्याकडून पिशव्या देणे सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास, फ्लेक्स, तोरण अशा वस्तूंचा वापर करण्यामध्ये राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्लास्टिकपासून बनविलेल्या पिशव्यांची किमान जाड़ी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी व आकार दिली.
तरीही शहरातील दुकाने, आस्थापना, हॉटेल, खानावळ, चायनीज हॉटेल, बियर शॉप, मटण- चिकनचे दुकान, मासळी बाजार, बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केलेला आढळत असल्यामुळे पालिकेच्या पथकाने सोमवारी अचानक धडक कार्यवाही करून ३४ किलो सिंगल युजप्लास्टिक जप्त केले. यापुढेही पथकाची कार्यवाही चालूच राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यापुढे आक्षेपार्ह प्लास्टिकच्या वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पथक प्रमुख चंद्रकांत दुधारे यांनी दिली
Comments
Post a Comment