Skip to main content

आमदार साहेब जरा आमची व्यथा पण ऐकुण घ्या हो.... गेल्या ७० वर्षा पासून मांजरीमाथा गावास रस्ताच नाही

 


ता.प्र, किनवट : किनवट तालुक्यापासून जवळच असलेल्या

 जलधरा ग्रामपंचायत गणापासुन ३कि.मी. अंतरावर वसलेले मांजरीमाथा हे गाव गेली ७० वर्षापासुन नरक यातना भोगत आहे या गावाला  ये-जा करण्याकरीता कुठल्याही प्रकारचा पक्का रस्ता अद्याप बांधण्यात आलेला नाही या गावची लोकसंख्या ४५० ते ५००पर्यंत असुन येथे सर्व वस्त्या घरे हे बहुतांश आदीवासी बहुल समाजाची आहेत मांजरी माथा हे गाव माळरानात वसलेल आहे परंतु ये-जा करण्याकरीता गावक-यांना पायी चालावे लागते पक्का रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून जिवावर उदार होऊन मार्ग काढावा लागतो तसेच  गर्भवती महीला, वयोवृद्ध ,शालेय विद्यार्थी यांना खुप संकटाचा सामना करावा लागतो आज पर्यंत २० ते २५ लोक या रस्त्या अभावी मृत्युमुखी पडले आहेत वयोवृद्ध लोक तर यांना अती प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याच्या कामाकरीता लोकप्रतिनिधी ,राज्य शासन- प्रशासन व संबधीत बांधकाम विभाग  अनेक वेळा निवेदने, देण्यात आली परंतु यांच्या या गंभीर समस्येकडे कोणताही प्रतीनीधी ना कोणता अधिकारी फीरकला नाही यामुळे नागरीक नाईलाजास्तव अमरण उपोषणाच्या पवित्र्यात आहे तात्काळ गावातील गावक-यांच्या समस्या जाणून घेऊन पक्का डांबरी रस्ता बाधुन हि समस्या कायमची सोडवावी अशी मागणी आहे अन्यथा नाईलाजाने  तेथील नागरीक करीत आहे २४ जानेवारीला उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असे गावक-यांनी सांगीतले आहे ही बाब विकासाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...