(किनवट ता. प्र.)
महाराष्ट्रात उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगड, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतील मैदानी भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट दिसते आहे. उत्तर व पश्चिम भारतात
अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्याने महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीची तीव्रता वाढली आहे याचाच परिणाम किनवट- माहुर तालुक्यात बघावयास मिळत आहे म्हणुन जागो जागी सांयकाळी लोक शेकोट्याचा आधार घेऊन थंडी पासुन बचाव करत आहेत तर हिच थंडी शेतकी पिकांसाठी चांगली असुन त्यामुळे पालेभाज्या व फळे यांची आवक वाढली आहे असे किनवट जवळील गाव खरबी येथील प्रगत शेतकरी राजु पांडे व घोटी येथील शेतकरी सचिन मगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
Comments
Post a Comment