Skip to main content

Posts

Showing posts from March, 2025

राष्ट्रपिता जोतीराव फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या स्वागत अध्यक्षपदी मा. आमदार भीमराव केराम यांची निवड

  (तालुका प्रतिनिधी किनवट) राष्ट्रपिता म. जोतीराव फुले १९८ व्या व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त सोहळा जयंतीच्या स्वागताध्यक्षपदी किनवट- माहुरचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांची निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत असे कि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त जयंती सोहळ्याचे विविध कार्यक्रमाचे आयोजन ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे त्या निमित्त आमदार भीमराव केराम यांचे शाल पुष्पहार नियुक्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला यावेळी संयुक्त जयंतीचे अध्यक्ष विनोद भरणे, शंकर नगराळे, प्रसेनजीत कावळे, विनोद मुनेश्वर, निखील सर्पे, निखिल वि. कावळे, गौतम पाटील, गंगाधर मुनेश्वर, सुमेध कापसे, संघटक, सल्लागार समिती, प्रसिद्धी प्रमुख समिती , सदस्य आदी युवक उपस्थित होते या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले आहे.

प्रा. डॉ. आनंद भालेराव यांना करिअर कट्टा उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार

  किनवट:-  बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील  . रसायनशास्त्र विभागप्रमुख निवृत्त प्रा. डॉ. आनंद भालेराव यांना नादेड जिल्हातील करिअर कट्टा उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार मिळाला , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .के. बेंबरेकर यांनी अभिनंदन केले, याप्रसंगी प्रा. संतोष पवार, प्रयोगशाळा सहाय्यक नारायण पवार, प्रयोगशाळा परिचर काशिनाथ पिपरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भालेराव यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम विद्यार्थाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आयोजित केले होते, स्पर्धा परिक्षा संदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले, अनेक विद्यार्थी ना उच्च शिखरावर पोहचविले , करिता उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र तंत्रज्ञान सहायता केन्द्र महाराष्ट्र विभाग यांच्या वातिने पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल महाविद्यालय' विद्यार्थी व मित्रपरिवार,सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत व अभिनंदन होत आहे.

कै .बापूराव पाटील कदम करकाळेकर यांच्या स्मरणार्थ वासंतिक कथायन करकाला येथे संपन्न

उमरी ता. प्र. ग्रामीण भागात महाराष्ट्रातील असंख्य साहित्यिक करकाला गावात आले असता  व्हीपीके उद्योग समूहचे अध्यक्ष श्री.मारोतराव कवळे गुरूजी मार्गदर्शन  करताना व उपस्थित  जनसमुदाय.  तसेच वासंतिक कथायन सत्राचे अध्यक्ष  प्रा. डाॅ. शंकर विभुते, प्रमुख पाहुणे श्री. देवीदास फुलारी, प्रा.महेश मोरे  आयोजक  श्री दिगंबर कदम, सहभाग अनुपमा बन, सौ.रोहिणी पांडे, सौ.रूचिरा बेटकर, राम तरटे यांनी  विविध आशयाच्या  कथा कथन  करून  श्रोत्यांना  कधी  हसवून तर कधी  रडवून सोडले.   रघुनाथ पाटील कदम ,आनंद कदम, मल्लू  कमळे, साहेबराव कदम, संतोष कदम, उत्तम कदम, व्यंकट पाटील, दिलीप सावंत व गावातील महिला मोठ्या  संख्येने  उपस्थित  होत्या. सूञसंचालन  श्री  राम तरटे  यांनी केले तर आभार  श्री दिगंबर कदम यांनी  मानले. 🙏🏻💐🌷🌷💐🙏🏻

ॲड प्रज्योती चंद्रकांत हंडोरे यांची भेट

किनवट:-  राज्यसभा खासदार  तथा मा.सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री मुंबई उपनगरे जिल्हा तसेच भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष श्री.चंद्रकात हंडोरे साहेब यांच्या  सुविद्य पत्नी नगरसेविका बृहन्मुंबई महानगरपालिका श्रीमती. संगीता चंद्रकांत हंडोरे व त्यांच्या कन्या  मुंबई दक्षिण मध्य जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष ॲड. प्रज्योती चंद्रकांत हंडोरे हे श्री. साईराम बेजंकीवार यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त किनवट दौऱ्यावर आले असता त्यांची बेजंकीवार यांच्या घरी  सद्धीच्छा भेट घेऊन ॲड सम्राट यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

प्रदिप नाईक यांची प्रभारी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल अजय कदम व दया पाटील यांनी अभिनंदन केले

किनवट :  प्रकल्प अधिकारी किनवट मा.प्रदीप साहेबराव नाईक यांना प्रभारी नियुक्ती मिळाल्याबद्दल शुभेच्छा देताना तालुकाप्रमुख युवा सेना अजय पाटील कदम. विधानसभा प्रमुख दया पाटील.

गोंडर' कादंबरीला अखिल भारतीय जीवा सेना नाभिक समाज संघटनेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर

  ___________________________________ ○ 'गोंडर' कादंबरीचा हा 26 हा पुरस्कार ○ जीवा सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर ( मुंबई)यांनी भेट दिली.  ____________________________________ ' गोंडर' कादंबरीला अखिल भारतीय जीवा सेना नाभिक समाज संघटनेच्या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्र गोंडर'कार अशोक कुबडे यांच्या घरी  सुपूर्द करतांना अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर (मुंबई ),मा.प्रा.डॉ.दत्ता कुंचलवाड,जिल्हा अध्यक्ष मारुती उर्फ (बाळू) पवार, जिल्हा सचिव अशोक खोडके, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नामदेव शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष श्याम जाधव, युवा कार्याध्यक्ष किरण सूर्यवंशी, युवा जिल्हा संघटक अनिल सावंत, महानगर कार्याध्यक्ष उत्तम गाजलवाड, नांदेड उत्तर शहर सचिव मंगेश खोडके व अखिल भारतीय जिवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. """"""""""""""""""""""""""""""""""...

मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ तर मिनल करनवाल यांची जळगावला बदली...

  नांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्या मिनल करनवाल यांची जागा घेणार आहेत. मिनल करनवाल यांची #जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करनवाल आता जळगाव येथे मुख्य कार्यकारी पदी रुजू होणार आहेत. गेल्या अडीच वर्षात मिनल करनवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबविल्या आहेत. बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला. त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. नुकतीच त्यांनी बालिका पंचायत 2.0 नव्या टप्प्याची सुरुवात केली होती. नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधि...

लाडक्या बहिणींसाठी पळवला तब्बल ७ हजार कोटी रुपये मागास आणि आदिवासींचा निधी

  किनवट,दि.१७ : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने मागास आणि आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविला आहे.  सरकारची ही कृती घटनाबाह्य व गरीब समाजाच्या तोंडचा घास पळवणारी आहे.सरकारने हा निधी त्या त्या विभागाकडे त्वरीत  वर्ग करावा,अशी मागणी सेक्युलर मुव्हमेंट या संघटनेचे जिल्हा संघटक अॅड.मिलिंद सर्पे यांनी एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे नुकतीच केली आहे. लाडकी बहिण या खर्चिक योजनेसाठी अन्य कोणत्याही विभागाचा निधी आम्ही घेणार नाही, असे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते. मात्र सरकार ते विसरले आहे. या विभागातील तब्बल ७हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी या योजनेकडे वळवला आणि गरीब मागास समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यांचे हक्काचे पैसे वळवले व त्यांना याची साधी माहितीही या सरकारने दिली नाही, उलट दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.सरकारने निवडणूक जिंकली व लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी केली. निवडणुकीपूर्वी सरसकट प्रत्येक अर्ज मंजूर करणाऱ्या सरकारने निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताप्राप्ती होताच तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त बहिणींना या योजनेतू...

रमजान महिन्यात अखंड विज पुरवठा सुरु ठेवा- शेख मोईन.

किनवट तालुका प्रतिनिधी सय्यद नदीम/ किनवट : पवित्र रमजान महिन्याला दि २ मार्च पासून सुरुवात झाली असून या कालावधीमध्ये रोजा (उपवास) हा मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व असते या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जातात परंतु शहरात नेहमी विज खंडित राहत असल्याने व होणाया वारंवार लोड सेटिंग मुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने बीज पुरवठा अखंडीत सुरू ठेवण्याकरिता सामजिक कार्यक्रते वतीने दि 10 रोजी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनातून मागणी करण्यात आली एकीकडे मार्च महिन्यामध्ये कडक उष्ण वातावरण असून या कडक वातावरणात लहान मलं महिलावृद्ध व पुरुष हे उपवास करीत असतात तसेच इफ्‌तार व सहरीच्या वेळी विज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना यांचा नाहक त्रास होतो त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतेतसेच रात्रीच्या वेळी नमाज पठण करीत असताना विज पुरवठा बराच वेळ खंडित असतो वारंवार होणाया लोडशेटींगमुळे या पवित्र महिन्यात नागरिकांमध्ये एक नाराजी.महावितरण कंपनीच्या विरुद्ध निर्माण होते त्यामुळे या  पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारची लोडसेडिंग टाळावी व अखंड विज पुरवठा सुन...

इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिन्यात १०वर्षीय आयशाने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिन्यात १०वर्षीय आयशा फातिमा सय्यद इमरान अली ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा किनवट:  :-इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये ३० दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील पत्रकार सय्यद इमरान अली यांची १० वर्षाची मुलगी आयेशा फातिमा यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा रविवार 9मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी ५.१० वाजता सुरू होत असून संध्याकाळी ६.२८ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्यानी पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हाव...

किनवटचा भूमिपुत्र बॉलिवूडमध्ये झळकणार – ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटाची पत्रकार परिषद १३ मार्चला ,१८ मार्चला विशेष सोहळा

  किनवट: किनवट तालुक्यातील उभरता बॉलिवूड अभिनेता शुशांत ठमके याचा आगामी हिंदी चित्रपट ‘पिंटू की पप्पी’ लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्या जोशी आणि विधी यादव महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मैत्री मूव्ही मेकर्स प्रस्तुत, V2S प्रॉडक्शन & एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शिव हरे, तसेच निर्माते विधी आचार्य यांनी या चित्रपटाचे नेतृत्व केले आहे. *पत्रकार परिषद – 13 मार्च 2025* या ऐतिहासिक क्षणाची अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 13 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता, शासकीय विश्रामगृह, गोकुंदा (किनवट) येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. *विशेष सोहळा – 18 मार्च 2025* या निमित्ताने 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकूल, कोठारी (चि), किनवट येथे एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि माधुरी पवार यांचे लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहेत. या विशेष सोहळ्यात बॉलिवूडच्या ‘पिंटू की पप्पी’...

बहुजन समाज पार्टी किनवट/ माहूर विधानसभेच्या वतीने निवेदन

 किनवट:- 1949 च्या महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्ती करून बिहार येथिल बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या करिता सुरू असलेल्या भिकू संघाच्या उपोषणाला पाठिंबा असण्याबाबत महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय जिल्हाधिकारी साहेब तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट मार्फत बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भीमराव पाटील किनवट विधानसभा अध्यक्ष ,अशोक पाटील विधानसभा उपाध्यक्ष किनवट ,मिलिंद धावारे जिल्हा सचिव ,विजय वाघमारे सचिव, सुखदेव कांबळे सहसचिव, संजय ठोके शहराध्यक्ष ,साहेबराव वाढवे शहर उपाध्यक्ष, किशन परेकर ,गंगाधर कदम ,अंकित गायकवाड, आशिष फुलझले, शंकर गायकवाड, सुमनबाई, अनुसयाबाई उमरे ,सुमनबाई परेकार ,सुमेध गायकवाड अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नविन शासकीय ईमारतीतील वाचनालयास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे : किनवट वकील संघाची मागणी

  किनवट,दि.१२ : नांदेड येथील जिल्हा व सत्र  न्यायालयाच्या नविन शासकीय ईमारतीतील वाचनालयास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच नवीन ईमारतीतील प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन आज(दि.१२) किनवट न्यायालयाच्या  बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले.     निवेदनावर किनवट न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.डी.सोनकांबळे, सचिव एस.पी .सिरपुरे, जेष्ठ  वकील सुभाष ताजने, टी.एच.कुरेशी यांच्यासह अनेक वकीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. -------------------------------------------------------•

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.

महाबोधी विहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने उपविभागिय अधिकारी कार्यालया मार्फत राष्ट्रपतीनां निवेदन

  किनवट:- सविस्तर माहिती असी की, बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरूस्ती करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे याबाबत आज दि. 6 मार्च 2025 रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांच्या  मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भा. बौ. म. तालुका अध्यक्ष तथा जिल्हा संघटक अभि. प्रशांत ठमके सर, तालुका सरचिटणीस प्रा. राजाराम वाघमारे सर, तालुका कोषाध्यक्ष उपा. भारत कावळे सर, जिल्हा पर्यटन व प्रचार विभागाचे बौध्दाचार्य महेंद्र नरवाडे सर, तालुका संस्कार विभागाचे बौध्दाचार्य अनिल उमरे, बौध्दाचार्य गंगाधर कदम, प्रा. दिलीप पाटील, वार्ड शाखा अध्यक्ष उपा. कैलास पाटील, उपा. भगवान मुनेश्वर, उपा. सुंदर भगत, वार्ड शाखा अध्यक्ष जनार्दन भगत, उपा. देवराव सोनकांबळे, उपा. विजय वाघमारे, उपा. अभय नगराळे, पत्रकार विवेक ओंकार उपस्थित होते. व 37 महीला पदाधिकारी व पुरुष यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.

बौध्द गया येथील महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी किनवट येथील 15 लोकांची टिम बौध्द गया येथे रवाना

  किनवट ता. प्र. गेल्या 20 दिवसांपासून बौद्ध गया *महाविहार* मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात, जगात पेटले असताना जागृतीचे केंद्र म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे तो किनवट तालुका.  आज दि. 5 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने 15 लोकांची टिम  बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किनवट येथून रवाना झाली आहे.  यावेळी भा. बौ. म. ता. अध्यक्ष तथा जिल्हा संघटक अभि. प्रशांत ठमके सर, भा. बौ. म. महिला तालुका शाखा अध्यक्षा उपा. शुभांगी ताई ठमके, जिल्हा पर्यटन प्रचार विभागाचे महेंद्र नरवाडे सर, ता. कोषाध्यक्ष उपा. भारत कावळे सर, संस्कार विभागाचे बौध्दाचार्य अनिल उमरे, उपा. प्रशांत डवरे सर, उपा. राहुल तामगाडगे, उपा.विवेक ओंकार, उपा. बाबासाहेब आढाव, उपा.सुरेश कयापाक, उपा. आम्रपाली वाठोरे (कांबळे), उपा. पुनेरथा तामगाडगे (उमरे), उपा. ज्योती ताई शेरे (कदम) उपा. नंदा नगारे, उपा. सिमा विवेक नरवाडे,उपा. शिल्पा अनिल परेकार,व असंख्य महिला पुरुष उपस्थित होते.

जिप परिषद योजना शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितित अरवींद तरे ठरले कराओके गीत गायन स्पर्धेचे महागायक

  श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी धकाधकीच्या जीवनात स्वतःची आवड छंद जोपासायला आपल्याला वेळ मिळत नाही तरी आपण वेळ काढून आपली आवड छंद जोपासली पाहिजे. ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत महत्वपूर्ण आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपली कला जोपासली पाहिजे, असे उदगार नांदेड जिल्हा परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी काढले. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ रजि मराठवाडा विभागाच्या वतीने आयोजित शिक्षकांचा राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव हर्षल साबळे, नागपूर विभागाचे अध्यक्ष नरेंद्र कन्नाके, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, सरफराज दोसांनी, बालाजी कोंडे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलित केल्यानंतर 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले. सुत्रसंचालन नदिड जिल्हा सरचिटणीस  रुपेश मुनेश्वर केले तर आभार मराठवाडा विभागाचे सचिव शेषराव पाटील यांनी केले. महारा...

गोकुंदा येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा समारोप

  किनवट : (ता.३) भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे आज दि.३मार्च २०२५रोजी *उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा* समारोप भारतीय बौध्द महासभेचे नांदेड जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला .सदर दहा दिवसीय शिबीर जिल्हा अध्यक्षा तथा केंद्रीय शिक्षिका अनिता ताई खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२/०२/२०२५ ते ०३/०३/२०२५ या कालावधीत संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड चे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक माधवराव सर्पे,कोषाध्यक्ष आद.सुभाष नरवाडे. बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक एम.एम. भरणे,महिलाशाखेच्या जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई कुंटे, संस्कार उपाध्यक्षा विजयमाला नरवाडे यांनी उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी केले तर शांता दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शिबिरार्थी उपासिका दैवशाला सोनकांबळे, इंदुबाई वाघमारे, आम्रपाल...

समोर वडीलाचा मृतदेह दुसरीकडे दहावी इंग्रजीचा पेपर अशा असमंज्यस परिस्थितीत सुरजने दिली परीक्षा.. मुख्याध्यापकांनी दिला धिर

  किनवट ता. प्रतिनिधी- सुरज संजय जाधव वर्ग १० रा.सेवालाल नगर,टाकळी ता.उमरखेड हा विद्यार्थी सध्द्या दहावीची परीक्षा देत आहे.परंतु आज सकाळी ठीक ५:३०वाजता सुरजचे बाबा संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.सुरजच्या डोक्यावरचे छत्र हरपले.आज सुरजचा इंग्रजी विषयाचा बोर्डाचा पेपर होता. समोर वडीलांचा मृत देह ,अंत्यविधी,आणि परीक्षा अशा  दुःखाचा डोंगर चढण्याची वेळ सुरज वर आली.मनाची विचलता,वडीलांच्या निधनाच्या वेदना,जवळ जवळ सुरज जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र,परंतु अशावेळी त्यांनी शाळेचे मु.अ.अरविंद राठोड यांच्याशी फोन वर बोलुन परीक्षा न देण्याचे सांगितले ,सरांनी सुरजचे सांत्वन करत,परीक्षा देऊन तु तुझ्या बाबांना खरी श्रध्दांजली दे,आणि त्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन,त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात हे पटवुन सांगितले आणि सुरज शेवटी परीक्षा द्यायला तयार झाला.सआश्रु नयनाने वडीलांची अंत्यविधी आटोपुन परीक्षेसाठी सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, किनवट या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.सुरज जाधव हा इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय ,गोकुंदा या शाळेचा विद्यार्थ...