Skip to main content

जिप परिषद योजना शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितित अरवींद तरे ठरले कराओके गीत गायन स्पर्धेचे महागायक

 



श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी

धकाधकीच्या जीवनात स्वतःची आवड छंद जोपासायला आपल्याला वेळ मिळत नाही तरी आपण वेळ काढून आपली आवड छंद जोपासली पाहिजे. ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत महत्वपूर्ण आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपली कला जोपासली पाहिजे, असे उदगार नांदेड जिल्हा परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी काढले.


अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ रजि मराठवाडा विभागाच्या वतीने आयोजित शिक्षकांचा राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंडळाचे संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव हर्षल साबळे, नागपूर विभागाचे अध्यक्ष नरेंद्र कन्नाके, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, सरफराज दोसांनी, बालाजी कोंडे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलित केल्यानंतर 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले. सुत्रसंचालन नदिड जिल्हा सरचिटणीस 



रुपेश मुनेश्वर केले तर आभार मराठवाडा विभागाचे सचिव शेषराव पाटील यांनी केले.


महाराष्ट्राचा महागायक म्हणून ठाणे जिल्ह्यातील शिक्षक रवींद्र तरे हा ठरला तर राज्यातून दुसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक शिराज पठाण तर तिसरा क्रमांक सिद्धार्थ वाघ यांनी पटकावला. उत्तेजनार्थ विलास नरवाडे नदिड रजनी गोडबोले ठाणे संतोष चलोदे रत्नागीरी मुन्ना थोरात नदिड निलेश दोनाडकर चंद्रपूर यांना मिळाला आहे. तर विभागीय प्रथम हर्षल साबळे कोकण नंदकुमार उबाळे पुणे प्रीती भरणे अमरावती सुवर्ण नळगिरे मराठवाडा सुनील सिसोदे नाशिक यांना मिळाला आहे. परीक्षक म्हणून संगीततज्ञ राजू जाधव, संगीत विशारद सुरेश पाटील, गायन विशारद भारत कोडापे

यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले. सहभागी सर्वांनाच सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन फाल्गुनी उपरीकर यांनी केले तर आभार माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी मानले.


आनंद दत्तधाम आश्रमात संपन्न झालेल्या स्पधेर्चा महाअंतिम सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे, किरणकुमार वाघमारे, मनोज बारसागडे, बाबुराव माडगे, सुधाकर चवटे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे पाटील, मुन्ना थोरात, प्रवीण वाघमारे, सुरेशकुमार शेरे, सागर चेक्के, भाग्यवान भवरे, शितल गौरखेडे, डॉ. अरुण धकाते, प्रा. विनोद कांबळे, जितेंद्र वर्मा, यु.टी. पवार, पांडुरंग शेरे आदींनी परिश्रम घेतले.

 

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...