Skip to main content

गोकुंदा येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा समारोप

 


किनवट : (ता.३) भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे आज दि.३मार्च २०२५रोजी *उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा* समारोप भारतीय बौध्द महासभेचे नांदेड जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला .सदर दहा दिवसीय शिबीर जिल्हा अध्यक्षा तथा केंद्रीय शिक्षिका अनिता ताई खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२/०२/२०२५ ते ०३/०३/२०२५ या कालावधीत संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड चे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक माधवराव सर्पे,कोषाध्यक्ष आद.सुभाष नरवाडे. बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक एम.एम. भरणे,महिलाशाखेच्या जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई कुंटे, संस्कार उपाध्यक्षा विजयमाला नरवाडे यांनी उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी केले तर शांता दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शिबिरार्थी उपासिका दैवशाला सोनकांबळे, इंदुबाई वाघमारे, आम्रपाली कांबळे,दिपाली गीमेकर यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात सर्व शिबिरार्थी उपासिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट ची महिला शाखा स्थापन करुन नवनिर्वाचित अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ताई ठमके यांच्या सह सर्व पदाधिकारी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शुभांगी नरवाडे यांनी मिठाई व शितपेय वाटप केले.अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षिय समारोपांनतर त्यांच्या वतीने उपस्थित प्रमुख अतिथी सह सर्व शिबिरार्थी उपासिकांना भोजनदान करण्यात आले.शिबिराच्या यशस्वितेसाठी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे, कोषाध्यक्ष भारत कावळे,वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर, कैलास भरणे, अशोक सर्पे,सदानंद पाटील यांच्या सह राजर्षी शाहू नगर येथील महिलांनी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...