Skip to main content

गोकुंदा येथे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा समारोप

 


किनवट : (ता.३) भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे आज दि.३मार्च २०२५रोजी *उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा* समारोप भारतीय बौध्द महासभेचे नांदेड जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला .सदर दहा दिवसीय शिबीर जिल्हा अध्यक्षा तथा केंद्रीय शिक्षिका अनिता ताई खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२/०२/२०२५ ते ०३/०३/२०२५ या कालावधीत संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड चे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक माधवराव सर्पे,कोषाध्यक्ष आद.सुभाष नरवाडे. बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक एम.एम. भरणे,महिलाशाखेच्या जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई कुंटे, संस्कार उपाध्यक्षा विजयमाला नरवाडे यांनी उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी केले तर शांता दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शिबिरार्थी उपासिका दैवशाला सोनकांबळे, इंदुबाई वाघमारे, आम्रपाली कांबळे,दिपाली गीमेकर यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात सर्व शिबिरार्थी उपासिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट ची महिला शाखा स्थापन करुन नवनिर्वाचित अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ताई ठमके यांच्या सह सर्व पदाधिकारी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शुभांगी नरवाडे यांनी मिठाई व शितपेय वाटप केले.अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षिय समारोपांनतर त्यांच्या वतीने उपस्थित प्रमुख अतिथी सह सर्व शिबिरार्थी उपासिकांना भोजनदान करण्यात आले.शिबिराच्या यशस्वितेसाठी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे, कोषाध्यक्ष भारत कावळे,वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर, कैलास भरणे, अशोक सर्पे,सदानंद पाटील यांच्या सह राजर्षी शाहू नगर येथील महिलांनी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...