Skip to main content

रमजान महिन्यात अखंड विज पुरवठा सुरु ठेवा- शेख मोईन.


किनवट तालुका प्रतिनिधी सय्यद नदीम/

किनवट : पवित्र रमजान महिन्याला दि २ मार्च पासून सुरुवात झाली असून या कालावधीमध्ये रोजा (उपवास) हा मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व असते या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जातात परंतु शहरात नेहमी विज खंडित राहत असल्याने व होणाया वारंवार लोड सेटिंग मुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने बीज पुरवठा अखंडीत सुरू ठेवण्याकरिता सामजिक कार्यक्रते वतीने दि 10 रोजी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनातून मागणी करण्यात आली एकीकडे मार्च महिन्यामध्ये कडक उष्ण वातावरण असून या कडक वातावरणात लहान मलं महिलावृद्ध व पुरुष हे उपवास करीत असतात तसेच इफ्‌तार व सहरीच्या वेळी विज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना यांचा नाहक त्रास होतो त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतेतसेच रात्रीच्या वेळी नमाज पठण करीत असताना विज पुरवठा बराच वेळ खंडित असतो वारंवार होणाया लोडशेटींगमुळे या पवित्र महिन्यात नागरिकांमध्ये एक नाराजी.महावितरण कंपनीच्या विरुद्ध निर्माण होते त्यामुळे या  पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारची लोडसेडिंग टाळावी व अखंड विज पुरवठा सुनिश्चित करावा अशा आशयाची निवेदन शेख मोईन यांनी उप-कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी किनवट यांना देण्यात आले.यावेळी शे साजन,शे जमीर, सय्य्द सिद्दीख, शे चाँद,शे समीर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...