राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून यावेळी सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई : राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून लॉकडाऊन कडक नसला तरी निर्बंध लागू असणार अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पण यावेळी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. यासाठी २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील २०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रश
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com