Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यातील १०७ कोटींचा पीकविमा मंजूर


हिंगोली :मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी भरलेल्या पिकविम्याच्या रक्कमेपोटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात १०७ कोटींचा पीकविमा मंजूर झाला आहे . सलग दोन वर्ष हिंगोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाला असून गत  वर्षी  १२४ कोटीचा  पीकविमा मिळाला होता.  खासदार हेमंत पाटील यांनी सलग दोन्ही वर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंबंधी पाठपुरावा करून पीकविमा मंजूर करून घेतला आहे . 

               मागच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पेरणी आणि काढणीच्या वेळी अतोनात नुकसान झाले होते . त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला . मागील हंगामात हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आणि शासनाने मिळून ९५ कोटी रुपये भरले आहेत यामध्ये थेट शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३ कोटी १८ लाख , केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख तर राज्य शासनाने भरलेली रक्कम ४० कोटी ६०लाख  रुपये आहे . यावरून शेतकऱ्यांना यंदाच्या विम्याच्या रक्कमेपोटी १०७ कोटी रुपये मंजुर झाले  आहेत.एकूण विमा काढणारे शेतकरी ३लाख २ हजार आहेत त्यापैकी १ लाख २१ हजार लाभार्थी असून आजवर ७० हजार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ६५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत तर उर्वरित रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे विम्याची रक्कम वाढण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात एकूण पिकाचे क्षेत्र ३ लाख ४० हजार हेक्टर आहे तर  एकूण लागवडीचे क्षेत्र हे १ लाख ४७ हजार हेक्टर आहे .    हिंगोली जिल्ह्याला पहिल्याच टप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर होण्याची हि पहिलीच वेळ आहे याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण प केंद्र आणि राज्यस्तवर पाठपुरावा केला होता . सलग दुसऱ्या वर्षी हिंगोली जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा मंजूर झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद साजरा केला जात आहे . गतवर्षी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना १२४ कोटीचा पीकविमा मंजूर झाला होता.काही शेतकऱ्यांना पहिल्यांदाच पीकविमा मंजूर झाल्यामुळे आनंद साजरा केला आहे तर  सलग दोन वर्ष पीकविमा मंजुरीमुळे शेतकरी राजाने खासदार हेमंत पाटील यांच्या बद्दल आभार व्यक्त करतांना शेतकऱ्यांचे कैवारी असल्याची भावना बोलून दाखविली .खासदार हेमंत पाटील यांना सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नविषयी तळमळ आहे . त्यामुळेच ज्या- ज्या वेळी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी , दुष्काळ , गारपीट यामुळे नुकसान झाल्यानंतर थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे  तसेच सदैव जागरूक राहून पीकविमा मिळवून दिला आहे .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.