Skip to main content

प्रा. डॉ.गणेशराव शिंदे यांच्या जाण्याने शैक्षणिक अपरिमित हानी झाली , विद्यापीठासाठी त्यांचे अमुल्य योगदान - प्रा.डॉ. शेखर घुंगरवार




नांदेड:

प्रा.डाॅ. गणेश शिंदे सरांचा आणि माझा परिचय युवक महोत्सवाच्या माध्यमातून झाला होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा ..म्हणून त्यांना सरजी असेच मी नेहमी म्हणतं असे, त्यांना जेंव्हा समजले की मी हदगांव तालुकातला आहे, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला नेहमी 'शेखरराव' असे आदरपूर्वक संबोधीत असत. 

हदगांव तालुकातल्या  माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहात असत . तेंव्हा मला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटायचा...  गेल्या २० वर्षात त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक प्रसंग आले. मी प्राचार्य झाल्याच समजाच त्यांनी मला पहिला अभिनंदनचा फोन केला होता. कुठेही मोठेपणा मिरवताना त्यांना मी पाहिले नाही. जात पात हा विषय त्यांच्या आचरणात कधीच आढळला नाही. एक कर्तव्यकठोर आणि सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्थायीभाव होता.

विद्यापीठाचा युवक महोत्सव असला की गणेशराव व त्यांचे जीवलग मित्र प्रा.डाॅ.आंबादास कांबळे(हे सुद्धा आपल्या सर्वांना काही दिवसापूर्वी कायमचे सर्वांना सोडून गेले आहेत) हे संपूर्ण कामे अगदी अंगावर घेऊन दिवसरात्र ते काम करायचे. इतकेच नव्हे तर जेंव्हा गणेशराव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक झाले तेंव्हा युवक महोत्सव अत्यंत हसत खेळत, कोणते गालबोट न लागू देता अगदी यशस्वीपणे त्यांनी युवक महोत्सव संपन्न केले.

त्यांच्या काळात विद्यापीठाची 'नवीन  युवक महोत्सव नियमाली' तयार करण्यात आली.आज जी युवक महोत्सवाच्या स्पर्धामध्ये सूत्रबद्धता आली आहे, त्याचे सर्व श्रेय प्रा.डाॅ.शिंदे सरांना जाते, यात दुमत नाही.

अत्यंत हृदयस्पर्शी माणूस, हळव्या मनाचा  , कवी साहित्यिक, नाटककार , अभिनेता अशा अनेक क्षेत्रात लिलया आपली छाप सोडणारे ते 'बेताज बादशहा' होते. 

विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय  व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा होता.  हरहुन्नरी  कलाकार असलेले प्राध्यापक शिंदे सर हे मराठी विषयातले व्यासंगी... अभ्यासक आज आपल्यात नाहीत... . हे मनाला पटत नाही ... गणेशराव तुम्ही इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून जायला नको होते...............

निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐💐



Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...