Skip to main content

प्रा. डॉ.गणेशराव शिंदे यांच्या जाण्याने शैक्षणिक अपरिमित हानी झाली , विद्यापीठासाठी त्यांचे अमुल्य योगदान - प्रा.डॉ. शेखर घुंगरवार




नांदेड:

प्रा.डाॅ. गणेश शिंदे सरांचा आणि माझा परिचय युवक महोत्सवाच्या माध्यमातून झाला होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा ..म्हणून त्यांना सरजी असेच मी नेहमी म्हणतं असे, त्यांना जेंव्हा समजले की मी हदगांव तालुकातला आहे, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला नेहमी 'शेखरराव' असे आदरपूर्वक संबोधीत असत. 

हदगांव तालुकातल्या  माझ्या नातेवाईकांच्या लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहात असत . तेंव्हा मला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटायचा...  गेल्या २० वर्षात त्यांच्या सहवासात राहण्याचे अनेक प्रसंग आले. मी प्राचार्य झाल्याच समजाच त्यांनी मला पहिला अभिनंदनचा फोन केला होता. कुठेही मोठेपणा मिरवताना त्यांना मी पाहिले नाही. जात पात हा विषय त्यांच्या आचरणात कधीच आढळला नाही. एक कर्तव्यकठोर आणि सतत कार्यमग्न असणे हा त्यांचा स्थायीभाव होता.

विद्यापीठाचा युवक महोत्सव असला की गणेशराव व त्यांचे जीवलग मित्र प्रा.डाॅ.आंबादास कांबळे(हे सुद्धा आपल्या सर्वांना काही दिवसापूर्वी कायमचे सर्वांना सोडून गेले आहेत) हे संपूर्ण कामे अगदी अंगावर घेऊन दिवसरात्र ते काम करायचे. इतकेच नव्हे तर जेंव्हा गणेशराव स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक झाले तेंव्हा युवक महोत्सव अत्यंत हसत खेळत, कोणते गालबोट न लागू देता अगदी यशस्वीपणे त्यांनी युवक महोत्सव संपन्न केले.

त्यांच्या काळात विद्यापीठाची 'नवीन  युवक महोत्सव नियमाली' तयार करण्यात आली.आज जी युवक महोत्सवाच्या स्पर्धामध्ये सूत्रबद्धता आली आहे, त्याचे सर्व श्रेय प्रा.डाॅ.शिंदे सरांना जाते, यात दुमत नाही.

अत्यंत हृदयस्पर्शी माणूस, हळव्या मनाचा  , कवी साहित्यिक, नाटककार , अभिनेता अशा अनेक क्षेत्रात लिलया आपली छाप सोडणारे ते 'बेताज बादशहा' होते. 

विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय  व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा होता.  हरहुन्नरी  कलाकार असलेले प्राध्यापक शिंदे सर हे मराठी विषयातले व्यासंगी... अभ्यासक आज आपल्यात नाहीत... . हे मनाला पटत नाही ... गणेशराव तुम्ही इतक्या लवकर आम्हा सर्वांना सोडून जायला नको होते...............

निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐💐



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला