Skip to main content

खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटील दरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी

 




हिंगोली/नांदेड /यवतमाळ  : खरीप पेरणीचा  हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  केंद्र सरकारने रासायनिक खतांची  केली  आहे 

ही केलेली दरवाढ रोखली तरच या देशातील शेतकरी जगेल

 अन्यथा कोरोनाच्या आणि आर्थिक मंदीच्या लाटेत या देशातील शेतकरी आर्थिक ओझ्याने भरडून निघेल  

त्यामुळे केंद्राने केलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे केली आहे.

   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे  देशातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे 

सदैव शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे मांडणारे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकरी हित लक्षात घेऊन खतांच्या दरवाढी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, खरीप पिकाची पेरणी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे.
याबाबत सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून या दरवाढीचा गांभीर्यने दखल घेऊन तातडीने दरवाढ मागे घ्यावी.सध्या  प्रत्येक ५० किलो खतांच्या पोत्यामागे १००० ते २००० 

रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे,यामध्ये डीएपी पूर्वी किंमत - १२०० आता वाढीव १९०० 

रु.पोटॅश पूर्वी किंमत ८५० आता वाढीव  १००० रु.तर १०:२६:२६ पूर्वी किंमत ११७५ आता 

वाढीव १७७५रु. १२: ३६ पूर्वी किंमत ११८५ आता वाढीव किंमत १८०० रु तर १६:१६:१६ ची 

पूर्वीची  किंमत ११७५ आणि आताची वाढीव किंमत १४०० रुपये करण्यात आली आहे .

सर्व खतामध्ये एकूण ५५ टक्के दरवाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना या चार खतांसाठी १० हजार पर्यंत किंमत मोजावी लागत आहे.त्यामुळे ही  करण्यात आलेली

 दरवाढ देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईत नेऊन टाकणारी आहे .
     
  आधीच कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाचे भाव गडगडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात 

ऐन  खरीप पिकाच्या पेरणीच्या तोंडावर खताची  दरवाढ करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचा प्रकार आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या 

खात्यावर पैसे टाकून सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे अश्या मार्गाने भरपाई करून घ्यायची  अश्या प्रकारचे अन्यायकारक आणि 

दुटप्पी धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा  घणाघाती आरोप  खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. 

कोरोनाच्या आजाराच्या काळात आर्थिक मंदीची लाट सुरू असताना देशातील हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोष 

देशाच्या पंतप्रधानांनी ऐकला पाहिजे तरच या देशातील शेतकरी जगेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांच्या समवेत आ.संतोष बांगर,आ.बालाजी कल्याणकर,

जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, 

उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राम कदम, 

दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...