Skip to main content

खतांची दरवाढ रोखली तरच शेतकरी जगेल- खासदार हेमंत पाटील दरवाढ मागे घेण्याची केली पंतप्रधानाकडे मागणी

 




हिंगोली/नांदेड /यवतमाळ  : खरीप पेरणीचा  हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  केंद्र सरकारने रासायनिक खतांची  केली  आहे 

ही केलेली दरवाढ रोखली तरच या देशातील शेतकरी जगेल

 अन्यथा कोरोनाच्या आणि आर्थिक मंदीच्या लाटेत या देशातील शेतकरी आर्थिक ओझ्याने भरडून निघेल  

त्यामुळे केंद्राने केलेली ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडे केली आहे.

   खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने खतांच्या किंमतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे  देशातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटाचा  सामना करावा लागत आहे 

सदैव शेतकरी प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे मांडणारे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी सुद्धा शेतकरी हित लक्षात घेऊन खतांच्या दरवाढी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, खरीप पिकाची पेरणी १५ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ अत्यंत अन्यायकारक आहे.
याबाबत सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून या दरवाढीचा गांभीर्यने दखल घेऊन तातडीने दरवाढ मागे घ्यावी.सध्या  प्रत्येक ५० किलो खतांच्या पोत्यामागे १००० ते २००० 

रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे,यामध्ये डीएपी पूर्वी किंमत - १२०० आता वाढीव १९०० 

रु.पोटॅश पूर्वी किंमत ८५० आता वाढीव  १००० रु.तर १०:२६:२६ पूर्वी किंमत ११७५ आता 

वाढीव १७७५रु. १२: ३६ पूर्वी किंमत ११८५ आता वाढीव किंमत १८०० रु तर १६:१६:१६ ची 

पूर्वीची  किंमत ११७५ आणि आताची वाढीव किंमत १४०० रुपये करण्यात आली आहे .

सर्व खतामध्ये एकूण ५५ टक्के दरवाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना या चार खतांसाठी १० हजार पर्यंत किंमत मोजावी लागत आहे.त्यामुळे ही  करण्यात आलेली

 दरवाढ देशातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईत नेऊन टाकणारी आहे .
     
  आधीच कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाचे भाव गडगडले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात 

ऐन  खरीप पिकाच्या पेरणीच्या तोंडावर खताची  दरवाढ करणे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचा प्रकार आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या 

खात्यावर पैसे टाकून सहानुभूती दाखवायची आणि दुसरीकडे अश्या मार्गाने भरपाई करून घ्यायची  अश्या प्रकारचे अन्यायकारक आणि 

दुटप्पी धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा  घणाघाती आरोप  खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. 

कोरोनाच्या आजाराच्या काळात आर्थिक मंदीची लाट सुरू असताना देशातील हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश आणि असंतोष 

देशाच्या पंतप्रधानांनी ऐकला पाहिजे तरच या देशातील शेतकरी जगेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांच्या समवेत आ.संतोष बांगर,आ.बालाजी कल्याणकर,

जिल्हा परिषद सदस्य भानुदास जाधव, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे, 

उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धव गायकवाड, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राम कदम, 

दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.