(प्रतिनिधी) : नितीन कांबळे
शहरी भागामध्ये कोरोनाची संख्या जास्त प्रमाणात दिसुन येत होती. आता त्याच पाठोपाठ ग्रामीण भागामध्ये सुद्धा करोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना आपल्याला दिसुन येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक गावामध्ये कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे ग्रामपंचायत सदस्य आकाश सुर्यवंशी यांनी म्हटले आहे.
सध्याच्या काळात ग्रामीण भागामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रसार पाहुन रुग्णांना लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे असुन त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा हे कोविड सेंटर म्हणुन उपयोग करावा. त्यामुळे रुग्णालयावरील ताण कमी होईल व त्यांना ताबडतोब उपचार मिळण्यास चांगली मदत होईल आणि कोविड सेंटर गावात उभारल्यास रुग्णांना त्यांच्या घरचे जेवण मिळेल व कोणताही त्रास होणार नाही. गावामध्ये कमी खर्चात उपचार होईल. रुग्णांवर प्राथमिक अवस्थेत उपचार होणे गरजेचे आहे. लक्षणे असल्यास चाचणी करुन योग्य ते औषध उपचार केल्यास पेशंटची तबेत लवकर चांगली होईल व त्यांच्या मनातील कोरोनाची भिती निघुन जाईल व पेशंट लवकर बरा होईल. यासाठी गावातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे ग्रामपंचायत सदस्य आकाश सुर्यवंशी यांनी सांगीतले आहे.
Comments
Post a Comment