Skip to main content

हिंगोली जिल्ह्यातील बँकांनो, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी खा. हेमंत पाटील यांची बँकांना ताकीद

 


हिंगोली : - जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पिक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत कमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे.  कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी ताकीद खासदार हेमंतभाऊ पाटील यांना बँक अधिकाऱ्यांना दिली.

     आज दि. २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक कर्ज वाटप संदर्भात राष्ट्रीयकृत बँकाना येणाऱ्या अडचणी बाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत खा. हेमंत पाटील बोलत होते.

    या बैठकीस हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     या वेळी आढावा घेताना खा. हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी यासाठी बँकाना महत्वपूर्ण सूचना केल्या.

    बँकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत तसेच शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करीत हे पुन्हा होऊ देऊ नका अशी स्पष्ट ताकीद दिली.

    जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा जास्तीत जास्त होण्यासाठी लाईन ऑफ अँक्शन ठरवून प्रत्येक बँकेने आठ दिवसांचे शेड्यूल येत्या दोन दिवसात द्यावे अशा सूचनाही केल्या.



      बँकेकडे असलेल्या दत्तक गावांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रात प्रकाशित करावी जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळली जाईल, बँक प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करावी त्यामुळे बँकातील अनावश्यक गर्दी कमी होऊन शेतकर्यांच्या वेळेची व पैशाची बचत होईल.

 खा. हेमंत पाटील हे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात नेहमीच अग्रेसर असतात. याच अनुषंगाने आजची ही महत्वपूर्ण आढावा बैठक होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला