Skip to main content

अठरा भाषा अवगत असलेले प्रतिभावंत साहित्यिक ,शाक्तवीर छञपती संभाजी राजे यांच्या३६४ व्या जयंती निमित्त प्रा. दगडु भरकड यांचा विशेष लेख



छञपती.. शिवरायांच्या निधनानंतर  स्वराज्य दुपटीने , सैन्य, शस्ञसाठा,  राज्य खजिना  तीन पटीने वाढविणारे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती संभाजी राजे रणमैदानावरील शौर्य गाजविण्यासोबत लेखन बहाद्दर ही होते .त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्यावर सईबाईच्या पोटी झाला .सईबाई बाळांतपणापासून आजारी असल्याने त्यांचे निधन ५ सप्टेंबर १६५९ रोजी झाले .तेव्हा बाळ शंभूराजे  साधारणतः अडीच वर्षाचे होते .त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी राजमाता जिजाऊ यांच्यावर आली .छञपती शिवरायांप्रमाणे बाळ शंभूराजे यांच्यावर संस्कार , शिक्षण ,घोड्यावर बसणे ,तलवार ,दांडपट्टा चालविणे , युद्ध नितीचे,  राज्यकारभाराचे धडे दिले. १६६५ साली स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखानाचे संकट आले .स्वराज्यात धुडगुस घातला ,रयतेला ञस्त करून सोडले तेव्हा छञपती शिवरायांना  रयतेसाठी मिर्झा राजे जयसिंगा सोबत पुरंदरचा अपमानकारक तह करावा लागला .या तहान्वये स्वराज्यातील तेवीस किल्ले मुघलास द्यावे लागले .शंभूराजास वयाच्या आठव्या वर्षी मुघलाकडे पंचहजारी मनसबदार व्हावे लागले .याचा अर्थ बाळ शंभूराजे आठ वर्षाचे होते तेव्हा पासून छञपती शिवरायांसोबत प्रत्यक्ष राजनितीत सहभागी होते .स्वराज्यासाठी ,रयतेसाठी छञपती शिवरायांनी बाळ शंभूराजास मिर्झा राजे जयसिंगाकडे ओलीस ठेवले केवढा हा त्याग . तहान्वये मुघल बादशहा औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रा येथे छञपती शिवरायांना जायायचे होते सोबत शंभूराजे ही मनसबदार म्हणून गेले .औरंगजेबाच्या राजदरबारात शिवरायांना मागच्या पंक्तित उभे करून अपमानित केल्यांने छञपती शिवरायांनी औरंगजेबानी दिलेले वस्ञ भिरकावून भर सभेत दाखविलेला स्वाभिमान हे शंभूराजानी आपल्या डोळ्यांनी पाहिला .त्यामुळे सहाजिकच हे गुण शंभूराजानी आत्मसात केले .  शंभूराजे यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्याकडे दहा हजार सैन्याची फौज होती .विविध ठिकाणच्या  युद्ध मोहिमांवर सैन्याचे नेतृत्व करत असत .छञपती शिवरायांनी शंभूराजास २६ जानेवारी १६७१ रोजी वयाच्या चौदाव्या वर्षी पन्हाळगडावर स्वतंत्र  राजधानी स्थापन करून स्वतंत्र राजपद दिल्यांने ते स्वतंत्र राज्यकारभार करत होते . छञपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पहिले युवराज म्हणून शंभूराजांचे पटबंधन ही झाले होते . राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी छञपती शिवरायांनी  दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली व मुघलानी स्वराज्यावर आक्रमण करू नये यासाठी शंभूराजास दिलेरखानाच्या गोठात पाठविले हा शिवनीतीचा भाग होता आणि यात शंभूराजे यशस्वी झाले .३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर 
छञपती शिवरायांच्या निधन झाले की दुसरे काही अघटीत ( हा संशोधनाचा भाग आहे )  .ही बातमी  मोरोपंत पिंगळे ,अण्णाजी दत्तो ,राहुजी सोमनाथ ,बाळाजी आवजी यांनी काही दिवस शंभूराजास माहिती होऊ दिली नाही ऐवढेच नव्हे तर स्वराज्याचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना हातासी धरून शंभूराजास अटक  करून स्वराज्याची सुञे राजारामाच्या माध्यमातून त्यांना हाती घ्यायची होती . पण ते यशस्वी होऊ शकले नाही .
१६ जानेवारी १६८१ रोजी शंभूराजे राज्याभिषेक  करून स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छञपती झाले . १६८१ ते १६८९  या नऊ वर्षाच्या कालावधीत स्वराज्याचे रक्षण व विस्तार करण्यासाठी २३०० विविध आघाड्यावर लढाया करून  पोर्तुगीजांचे तीन चतुर्थांस राज्य जिंकणारे , कर्नाटकातील स्वराज्य दुप्पट करणारे , औरंगजेबाच्या लाखोंच्या सैन्यास सळो की पळो करून सोडणारे ,इंग्रज ,फ्रेंच , डच , सिद्दीस वटणीवर आणणारे छञपती संभाजी राजे शुरवीर , पराक्रमी ,मुत्सद्दी ,न्यायी , प्रजाहितदक्ष ,निर्व्यसनी राजा होते .तरीही ब्राम्हणी कथा, कादंबरी ,नाटककारांनी शंभुराजे व्यसनी होते , व्यभिचारी होते असे लिहिले असे जर असते तर रणमैदान गाजविणारे ,स्वराज्य वाढविणारे त्यांचे काय बाप होते का ? असे म्हणावे लागेल . औरंगजेब  बादशहांच्या लाखोंच्या सैन्यास स्वराज्यातील एक किल्ला ही जिंकता येत नसल्यांने बादशहा औरंगजेब आपल्या सैनिकास म्हणतो ," मेरे सब सरदारोंके बजाय एक संभाजी मेरे पास होता तो हम कब के हिंदुस्थान के आलमगीर बन गये होते ." मराठ्यांचा कट्टर शञू
मुघल इतिहासकार महम्मद हाशिम काफीखान म्हणतो, छञपती संभाजी राजे छञपती शिवरायांपेक्षा दहापटीने तापदायक राजे होते . फ्रेंच इतिहासकार लिहून ठेवतो ,संभाजी राजे छञपती शिवरायांप्रमाणेच चारित्र्यसंपन्न राजे होते असे शञूनी लिहिले . जागतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असा पराक्रम करणाऱ्या छञपती संभाजी राजास तत्कालीन ब्राम्हणानी व नंतरच्या ब्राम्हण व ब्राम्हणाळलेल्या इतिहास लेखकांनी रगेल व रंगेल , दुराचारी ,व्यभिचारी होता म्हणून आमच्या समोर सादर केले आणि आम्ही स्वीकारले . वि.दा.सावरकरांसारखे स्वातंत्र्यवीर  म्हणतात, संभाजी राजे मदिरा व मदिराक्षीच्या आहारी गेले होते म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ,युगपुरुष मा.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब म्हणतात ,ज्यांच्या मांडीवर विश्वासाने डोके ठेवले त्यांनीच गळा कापला .ज्यांना वाचन लेखण करण्याचा अधिकार होता त्यांनीच ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा न लिहिता लिहिणाऱ्यानी  त्यांचा इतिहास लिहिला .इतिहास घडविला बहुजन मावळ्यांनी आणि लिहिला मनूवादी कावळ्यांनी .संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात , शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी .
राजमाता जिजाऊ व छञपती शिवरायांच्या संस्कारात वाढलेले दुसरे छञपती संभाजी राजे परस्ञी माते समान माणून सन्मान करणारे ,रयतेची काळजी घेणारे ,व्यसनापासून दूर राहणारे ,मुस्लिम मावळ्यांना समानतेची वागणूक देणारे ,विज्ञानवादी विचारांचे होते .अशा राजांची बदनामी का केली असा प्रश्न पडतो ,त्याचे कारण मनुस्मृती सहिंतेप्रमाणे शुद्रास शिक्षणाचा अधिकार नाही .संभाजी राजांनी शिक्षणच घेतले नाहीतर  वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभुषनम् हा राजनीतीवर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला .सातसतक, नखशिख, नायिकाभेद हे शृंगारिक व अध्यात्मिक हिंदी भाषेतील ग्रंथ लिहून ब्राम्हणाची मक्तेदारी संपुष्टात आणली . शंभूराजास अठरा भाषा अवगत होत्या . छञपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करू लागल्याने पेशवाई आणण्याचे स्वप्न भंग पावले .तीन वेळेस संभाजी राजास मारण्याचा कट रचला पण त्यात यश मिळाले नाही पण शेवटी ११ मार्च १६८९  रोजी औरंगजेब बादशहाच्या हाताने मनुस्मृती संहिते प्रमाणे मारले . माणूस किती जगला या पेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे .छञपती संभाजी राजे फक्त ३२ वर्षच जगले पण या ३२ वर्षात जगावे कसे व मरावे कसे हा आदर्श आमच्या पुढे ठेवून गेले .मुखर्रखानानी पकडून औरंगजेब बादशहा समोर हजर केल्यानंतर बादशहाने संभाजी राजास विचारले , स्वराज्याचा  खजिना कोठे आहे आणि कोणते मुघल सरदार फितूर आहेत हे सांगितल्यास जीवनदान देले जाईल संभाजी राजांनी मरण पत्करले पण स्वराज्याचा खजिना व फितूर सरदाराची नावे सांगितले नाही याला म्हणतात, विश्वास ,याला म्हणतात स्वराज्य प्रेम . हा खरा इतिहास  मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड व इतर कक्षाच्या व पुरोगामी विचारांच्या संशोधनामुळे आमच्या समोर येत आहे .आज संभाजी ब्रिगेड विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून छञपती संभाजी राजे व महामानवांचा वारसा चालवत आहे ही एक समाधानाची बाब आहे .काही विध्वंसक वृत्तीचे लोक छञपती शिवाजी महाराज ,छञपती संभाजी राजेंचे नाव घेऊन हिंदू-मुस्लिम वाद घडवून आणत वास्तविक पाहता छञपती शिवराय व शंभू राजांनी मुस्लिम मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले .दोन्ही राजांनी मुस्लीम मावळे ,स्ञीयांचा सन्मान केला .मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर नमाज अदा करण्यासाठी मस्जिद बांधली .कुराणचा आदर केला हा इतिहास समोर आणून संभाजी ब्रिगेड सारख्या तरूणांच्या संघटनेने हिंदू-मुस्लिम दंगली बंद केल्या .टिपू सुलतान ब्रिगेडचे शेख शुभानअली यांच्यासारखे तरूण वक्ते समोर आले . कथा ,कादंबऱ्या ,नाटक ,चिञपट हे इतिहास लेखनाची साधने होत नाहीत .आणि याच  साधनाच्या आधारे मराठ्यांची बदनामी केली आणि करत आहेत .चिञपटातून गावात अडीअडचणीत , दुःखात सर्व जाती धर्मातील लोकांना  मदत करणारा मराठा दाखविला जात नाही तर खलनायक दाखवून मराठा समाजाची बदनामी केली जाते हे थांबविले पाहीजे . आजच्या तरूणांनी छञपती संभाजी राजांचा  निर्व्यसनीपणा , स्ञियांचा सन्मान , भिन्न जाती धर्माचा आदर,  विविध भाषेचे ज्ञान मिळवून ज्ञानाच्या कक्षा विस्तृत  केल्यास निश्चितच राष्ट्राच्या विकासास दिशादर्शक ठरेल व खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल .

जय जिजाऊ ..
जय शिवराय..
जय शंभूराजे ..

**दगडू भरकड **
मराठा सेवा संघ ,किनवट

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला