Skip to main content

बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील

 


हिंगोली /नांदेड /यवतमाळ :  बँकांनो खबरदार ! जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा सज्जड दम खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत  बँकांना दिला.  खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही  हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत आपली आक्रमक  भूमिका स्पष्ट करतांना खासदार हेमंत पाटील बोलत होते  . 

                 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये नेहमीच प्रशासन आणि राष्ट्रीयकृत  बँकांची  उदासीनता दिसून येते . त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित रहातो परिणामी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते त्यामुळेच शेतकरी आणखीनच कर्जाच्या फेऱ्यात अडकतो . वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो . खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेतली आहे.  बँकांना निर्देश दिले असून जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक सुद्धा घेतली आहे . ते म्हणाले कि,  पीककर्ज वाटपासाठी  केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने काम करत आहेत. परंतु जिल्ह्यात असलेल्या  इतर  राष्ट्रीयकृत बँका या केवळ  व्यवसाय करत असून त्यांना शेतकरी सर्व सामान्य जनता यांच्याशी काहीही देणंघेणं नाही , शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे उद्धटपणे बोलणे , बँकेत प्रवेश  नाकारून अपमान करणे अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या  आहेत. त्यामुळेच बँकांनी  वेळीच वागणुकीमध्ये बदल करावा ,शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी , कागदपत्रांसाठी थांबवावी असे न केल्यास शिवसेना स्टाईलने बँकांना  उत्तर देण्यात येईल असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. शेतकरी प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका वेळोवेळी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे . कोरोनाच्या काळात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे त्यातच बँकांच्या मनमानी कारभारामुळे  शेतकरी वैतागला आहे  .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.