Skip to main content

बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील

 


हिंगोली /नांदेड /यवतमाळ :  बँकांनो खबरदार ! जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा सज्जड दम खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत  बँकांना दिला.  खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही  हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत आपली आक्रमक  भूमिका स्पष्ट करतांना खासदार हेमंत पाटील बोलत होते  . 

                 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये नेहमीच प्रशासन आणि राष्ट्रीयकृत  बँकांची  उदासीनता दिसून येते . त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित रहातो परिणामी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते त्यामुळेच शेतकरी आणखीनच कर्जाच्या फेऱ्यात अडकतो . वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो . खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेतली आहे.  बँकांना निर्देश दिले असून जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक सुद्धा घेतली आहे . ते म्हणाले कि,  पीककर्ज वाटपासाठी  केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने काम करत आहेत. परंतु जिल्ह्यात असलेल्या  इतर  राष्ट्रीयकृत बँका या केवळ  व्यवसाय करत असून त्यांना शेतकरी सर्व सामान्य जनता यांच्याशी काहीही देणंघेणं नाही , शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे उद्धटपणे बोलणे , बँकेत प्रवेश  नाकारून अपमान करणे अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या  आहेत. त्यामुळेच बँकांनी  वेळीच वागणुकीमध्ये बदल करावा ,शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी , कागदपत्रांसाठी थांबवावी असे न केल्यास शिवसेना स्टाईलने बँकांना  उत्तर देण्यात येईल असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. शेतकरी प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका वेळोवेळी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे . कोरोनाच्या काळात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे त्यातच बँकांच्या मनमानी कारभारामुळे  शेतकरी वैतागला आहे  .

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला