Skip to main content

बँकांनो खबरदार ! शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवाल तर- खासदार हेमंत पाटील

 


हिंगोली /नांदेड /यवतमाळ :  बँकांनो खबरदार ! जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल असा सज्जड दम खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत  बँकांना दिला.  खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही  हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत आपली आक्रमक  भूमिका स्पष्ट करतांना खासदार हेमंत पाटील बोलत होते  . 

                 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये नेहमीच प्रशासन आणि राष्ट्रीयकृत  बँकांची  उदासीनता दिसून येते . त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित रहातो परिणामी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते त्यामुळेच शेतकरी आणखीनच कर्जाच्या फेऱ्यात अडकतो . वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो . खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका  घेतली आहे.  बँकांना निर्देश दिले असून जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक सुद्धा घेतली आहे . ते म्हणाले कि,  पीककर्ज वाटपासाठी  केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने काम करत आहेत. परंतु जिल्ह्यात असलेल्या  इतर  राष्ट्रीयकृत बँका या केवळ  व्यवसाय करत असून त्यांना शेतकरी सर्व सामान्य जनता यांच्याशी काहीही देणंघेणं नाही , शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे उद्धटपणे बोलणे , बँकेत प्रवेश  नाकारून अपमान करणे अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या  आहेत. त्यामुळेच बँकांनी  वेळीच वागणुकीमध्ये बदल करावा ,शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी , कागदपत्रांसाठी थांबवावी असे न केल्यास शिवसेना स्टाईलने बँकांना  उत्तर देण्यात येईल असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला आहे. शेतकरी प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका वेळोवेळी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे . कोरोनाच्या काळात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे त्यातच बँकांच्या मनमानी कारभारामुळे  शेतकरी वैतागला आहे  .

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...