Skip to main content

किनवट येथे बुध्द पौर्णिमे निमित्त तथागतांना वंदन करण्यात आले

 

किनवट, दि.२६: सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात आज (दि.२६)"बौद्ध पौर्णिमा", हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. प्रारंभी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. प्रा.सुबोध सर्पे यांनी बुध्द वंदना घेतली व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आनंदराव ठमके यांनी समयोचित विचार व्यक्त केले. 

    यावेळी वंचित बहुजन आघाडी चे माधव कावळे, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सहसचिव ॲड. मिलिंद सरपे, यादव नगारे, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर , मनोहर पाटील, कपील कावळे, राजेश पाटील , शिलरत्न कावळे, सुगत नगराळे, विशाखा महिला मंडळाच्या कचरूबाई मुनेश्वर, सुशिला ठमके, जयमाला आळणे, सिंधुबाई कांबळे, सारजा कावळे,राहीबाई पाटील, लक्ष्मी पाटील, सूर्यकांता सर्पे, कृष्णावती धोटे, अॅड दिव्या सर्पे, रोहीनी मुनेश्वर, वर्षा ठमके, प्रतीक्षा ठमके, करुना पवार, वनीता पाटील , ललीता मुनेश्वर, रत्नमाला भरणे, सुजाता भरणे, रामबाई ठमके, सोमीत्रा कावळे, ज्योती कावळे, सुधाबाई परेकार, योजना पाटील, प्रभाबाई कापसे, शेशीकला कावळे, कौशल्या मुनेश्वर यांची उपस्थिती होती.

   सिध्दार्थ नगर  नवयुवक मंडळचे निखील कावळे, गौतम पाटील, आकाश सर्पे, निखिल सर्पे, सुमेध कापसे, शादाब खुरेशी,सचीन कावळे, आनंद कावळे, प्रतीक नगराळे, शुभम भवरे, बंटी भवरे, निवेदक कानींदे, गुडु भरणे, सिद्धार्थ भरणे, आदर्श येरेकार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते