शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी बांधव खावटी अनुदानापासुन वंचीत- भाजपा अनसुचीत जमाती मोर्चा नादेंड ग्रा. मोर्चाचे सहायक जिल्हाधिकारी , प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
ता. प्र. किनवट:- राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदीवासी बांधवांना खावटी अनुदान वंचित असल्याने त्यांना त्वरीत खावटी अनुदान द्यावे असे भाजप नांदेड ग्रामिण अनु.जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण मार्फत निवेदन ता.३०रोजी देण्यात आले. किनवट माहुरचे लोकप्रिय आमदार व भाजप अनुसुचीत जमाती मोर्चा ग्रामिण महाराष्ट्र यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवले आहे . या खावटी अनुदान वाटप संदर्भात खालील मागण्यांचा समावेश १) खावटी अनुदान प्रति ४०००रू.लाभार्थ्याच्यां (DBT)थेट बँक खात्यात जमा करावे. २) आदीवासी बांधवाना वस्तु खरेदी ऐच्छीक करण्याबाबत वस्तु, धान्य, किराणा, स्वरूपाच्या मटकी , चवळी ,हरभरा,वटाणा, उडीद, तुरदाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला , मिरची पावडर, मीठ , चहा, ई. मानवी जीवनावश्यक वस्तु करीता प्रती २००० नमूद आहे ती आदीवासी बांधवाना ऐच्छीक असावी ३) आदीवासी बांधवाना निरक्षर समजु नये ४) स्थानिक पातळीवर हक्क देण्यात यावे अशा मागण्या आहेत या निवेदनावर आमदार भीमराव केराम, गोवींद अंकुलवार, नादेंड ग्रामीण अ.ज. मोर्चा जिल्हाध्यक्ष , जितेंद्र कुलसंगे, ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कनाके, डि.जी. भीसे