Skip to main content

किनवट -अदिलाबाद या आंतरराज्य मार्गावर असलेल्या ध्यानभुमी येथे सम्राट अशोक, महात्मा जोतीराव फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी



प्रतिनिधीं:-

 किनवट-आदीलाबाद या आतंरराज्य मार्गावर असलेल्या महाध्यान भूमी महाविहार,तामसी,जिल्हा आदीलाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न,बोधिसत्व, 


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महान बौद्ध सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती दिनांक २४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 जयंती सोहळ्याचे उद्घाटक  बोथ मंडळाचे आमदार श्री.बापुराव राठोड यांच्या हस्ते या तिन्ही महामानवांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


महाध्यान भूमी महाविहार केंद्राचे अध्यक्ष भन्ते  शाकू बोधीधम्मा व संस्थेचे पदाधिकारी यांच्या आमदार श्री बापूराव राठोड यांचा शाल,पुष्पहार व "भगवान बुद्ध आणि त्यांचा उपदेश " हे ग्रँथाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भन्ते शाकू बोधीधम्मा यांनी बोथ मंडळाचे आमदार यांना महाध्यान भूमी महाविहार परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विविध मागण्याचे निवेदन केली आहे.

या परिसराचे सुशोभीकरण करण्याकरिता माझ्या आमदार निधीतून कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार बापुराव राठोड यांनी भन्ते यांना सांगितले आहे. 
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशनराव ठमके,सचिव संतोष सिसले लक्ष्मीकांत कांबळे, बाबू सोनूले,दयानंद भगत,किरण कहाते,अविनाश कयापाक,उत्तम हनवते आदी उपासक उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते