Skip to main content

वाढत्या घटना पाहता महावितरण कर्मचाऱ्यांना विद्युत टुल किट्स पुरवावे व कार्यालयात मनुष्यबळ वाढवावे



✍️राजेश पाटील/ किनवट:-


किनवट येथील महावितरण कार्यालयात एकुण कार्यरत कर्मचारी संख्या १२ आहे त्या पैकी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपतकालीन परीस्थीत  काम करणारे ४ कर्मचारी आहेत त्यापैकी बाह्यस्त्रोत कर्मचारी १ आहे तर किनवट शहरातील एकुण ग्राहक संख्या १५०००च्या वर आहे 
किनवट तालुक्यातील मांडवी व सारखणी येथील नुकतेच घडलेल्या घटना पाहता महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे( हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायर) अशा अन्य विद्युत संसाधणाची आवश्यकता आहे असे महावितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी सत्य परीस्थीतीचे मनोगत सांगीतले कुठे वायर स्पार्क झाला डिपीवर फ्युज मध्ये कॉपर एवजी  अॅल्युमिनीयम तार वापरावी लागते ती जळाल्यास  पुर्ण फिडर बंद करुन काम करावे लागते व कमी मनुष्यबळ अभावी तीन ते चार लोकावर ताण येतो त्यामुळे सहायक अभियंत्यानी वरीष्ठांशी चर्चा करुन कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधन सामग्री टुल किट्स पुरवावी त्यामुळे कार्यालयातील कामाचे योग्य नियोजन होईल असे कर्मचाऱ्यांचे म्हणने  आहे.

ठळक मुद्दे:-

◼️हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायरचा पुरवठा व्हावा.
◼️मनुष्यबळ कर्माचारी अभाव

◼️ पंधरा हजार ग्राहक असल्याने ग्राहकांची हेळसांड


◼️रिक्त पदे भरण्यात यावे

◼️कामावर कायम व बाह्य स्त्रोत कर्मचारी वाढवावे.


जाहीरात/Advertisement:







 

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...