Skip to main content

वाढत्या घटना पाहता महावितरण कर्मचाऱ्यांना विद्युत टुल किट्स पुरवावे व कार्यालयात मनुष्यबळ वाढवावे



✍️राजेश पाटील/ किनवट:-


किनवट येथील महावितरण कार्यालयात एकुण कार्यरत कर्मचारी संख्या १२ आहे त्या पैकी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपतकालीन परीस्थीत  काम करणारे ४ कर्मचारी आहेत त्यापैकी बाह्यस्त्रोत कर्मचारी १ आहे तर किनवट शहरातील एकुण ग्राहक संख्या १५०००च्या वर आहे 
किनवट तालुक्यातील मांडवी व सारखणी येथील नुकतेच घडलेल्या घटना पाहता महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे( हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायर) अशा अन्य विद्युत संसाधणाची आवश्यकता आहे असे महावितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी सत्य परीस्थीतीचे मनोगत सांगीतले कुठे वायर स्पार्क झाला डिपीवर फ्युज मध्ये कॉपर एवजी  अॅल्युमिनीयम तार वापरावी लागते ती जळाल्यास  पुर्ण फिडर बंद करुन काम करावे लागते व कमी मनुष्यबळ अभावी तीन ते चार लोकावर ताण येतो त्यामुळे सहायक अभियंत्यानी वरीष्ठांशी चर्चा करुन कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधन सामग्री टुल किट्स पुरवावी त्यामुळे कार्यालयातील कामाचे योग्य नियोजन होईल असे कर्मचाऱ्यांचे म्हणने  आहे.

ठळक मुद्दे:-

◼️हॅन्डग्लब्ज , टुलकीट, शॉटींग रॉड, किटकॅट लग्ज, कॉपर वायरचा पुरवठा व्हावा.
◼️मनुष्यबळ कर्माचारी अभाव

◼️ पंधरा हजार ग्राहक असल्याने ग्राहकांची हेळसांड


◼️रिक्त पदे भरण्यात यावे

◼️कामावर कायम व बाह्य स्त्रोत कर्मचारी वाढवावे.


जाहीरात/Advertisement:







 

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...