Skip to main content

बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक ,नाटककार डॉ. अंबादास कांबळे यांच्या जाण्याने साहीत्य व सांस्कृतीक चळवळ पोरकी झाली

 




किनवट : राजर्षी शाहूनगर, गोकुंदा येथील रहिवाशी प्रख्यात नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंबादास तोलाजी कांबळे ( वय 56 वर्षे ) यांचे शुक्रवार (दि. 23 एप्रिल 2021 ) राजी रात्री 10 वाजता नांदेड येथे  निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

        प्राणीशास्त्रात त्यांनी पी.एच.डी. घेतली होती परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी घेऊन रंगभूमीवरील आपली आवड सिद्ध केली होती. विविध विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांच्या एकांकिकांनी पारितोषीके पटकाविली आहेत.

       देशभरातील विविध विद्यापीठातून त्यांनी शोध निबंध वाचले होते. साहित्य अकादमी, नवी दिल्लीने प्रकाशित केलेल्या एकांकिका संग्रहात त्यांच्या एकांकिकेचा समावेश केला आहे. त्यांचा " गाव हरवलेली माणसं आणि इतर एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित झाला आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामात आंबेडकरी स्वातंत्र्य सैनानींचे ( कार्यकर्त्यांचे ) योगदान हा नाट्यग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

       अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस, सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य सह सेक्रेटरी, महाबोधी सोसायटीचे आजीवन सदस्य, सप्तरंग संस्थेचे संस्थापक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, प्राध्यापक संघटनेचे सक्रीय पदाधिकारी, स्वामुक्टा पदाधिकारी अशा विविध संस्थाचे ते पदाधिकारी होते. स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राज्यभरातील अनेक विद्यापीठांच्या युवक महोत्सवात परिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. कॉपीमुक्त परीक्षा घेणारे केंद्र संचालक म्हणून विद्यापीठ कार्यक्षेत्रात त्यांचा दरारा होता.

          प्राध्यापकांच्या समस्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून  झटणारे  कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला