Skip to main content

बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक ,नाटककार डॉ. अंबादास कांबळे यांच्या जाण्याने साहीत्य व सांस्कृतीक चळवळ पोरकी झाली

 




किनवट : राजर्षी शाहूनगर, गोकुंदा येथील रहिवाशी प्रख्यात नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयातील जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंबादास तोलाजी कांबळे ( वय 56 वर्षे ) यांचे शुक्रवार (दि. 23 एप्रिल 2021 ) राजी रात्री 10 वाजता नांदेड येथे  निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

        प्राणीशास्त्रात त्यांनी पी.एच.डी. घेतली होती परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी घेऊन रंगभूमीवरील आपली आवड सिद्ध केली होती. विविध विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांच्या एकांकिकांनी पारितोषीके पटकाविली आहेत.

       देशभरातील विविध विद्यापीठातून त्यांनी शोध निबंध वाचले होते. साहित्य अकादमी, नवी दिल्लीने प्रकाशित केलेल्या एकांकिका संग्रहात त्यांच्या एकांकिकेचा समावेश केला आहे. त्यांचा " गाव हरवलेली माणसं आणि इतर एकांकिका " हा एकांकिका संग्रह प्रकाशित झाला आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामात आंबेडकरी स्वातंत्र्य सैनानींचे ( कार्यकर्त्यांचे ) योगदान हा नाट्यग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

       अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस, सेक्युलर मुव्हमेंटचे राज्य सह सेक्रेटरी, महाबोधी सोसायटीचे आजीवन सदस्य, सप्तरंग संस्थेचे संस्थापक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष, प्राध्यापक संघटनेचे सक्रीय पदाधिकारी, स्वामुक्टा पदाधिकारी अशा विविध संस्थाचे ते पदाधिकारी होते. स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले. राज्यभरातील अनेक विद्यापीठांच्या युवक महोत्सवात परिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. कॉपीमुक्त परीक्षा घेणारे केंद्र संचालक म्हणून विद्यापीठ कार्यक्षेत्रात त्यांचा दरारा होता.

          प्राध्यापकांच्या समस्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून  झटणारे  कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.