Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने फुटपाथवरील कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत

 


ठाणे : ‘ब्रेक दि चैन ‘ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. पण या संचारबंदीचा फटका फुटपाथवरील कुटुंबाना बसल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने संचारबंदी व कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून ठाणे येथील साई बाबा मंदिर, वर्तकनगर व इतर ठिकाणी फुटपाथवर जीवन जगणा-या ३०० कुटुंबाना नास्ता व आर्थिक मदत करण्यात आली.


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, ठाणे जिल्हा युवा महिलाध्यक्षा ज्योती अहिरे, पत्रकार अभिजीत मोपकर, पत्रकार नितीन सागवेकर आदी पदाधिका-यांनी विशेष परिश्रम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंबीय व इतर गोर गरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करीत आहे. ज्यांच्या हातातोडांची गाठच पडत नाही असे फुटपाथवर आपलं आयुष्य संघर्षमय पद्धतीने जगणा-या कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने पुढाकार घेत आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र व देशभरातून कौतुक होत आहे..

Advertisement जाहिरात:




Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...