Skip to main content

प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांच्या सारख्या कसबी व्यक्तिमत्व जाण्याने पुढच्या पिढीच मोठ नुकसान झाल -डॉ. अशोक बेलखोडे

 किनवट  : प्रा.डॉ. अंबादास कांबळे ह्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या कसबी, कुशल कार्यकर्त्यांचं जाण हे जिव्हारी लागणारं आहे, पुढच्या पिढीचं मोठं नुकसान करणारं आहे. सर्व बाबतीत संवेदनशील असलेला हा माणूस होता, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले.

          येथील नाटककार तथा बळीराम पाटील महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अंबादास कांबळे यांचं शुक्रवारी (ता.२३) रोजी निधन झालं. त्यांच्या पावन स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी शनिवारी(ता.२४)  सायंकाळी ६ वाजता साने गुरुजी रुग्णालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. मंचावर ऍड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

        उत्तम कानिंदे यांनी बुद्धवंदना घेतली व सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. याप्रसंगी  प्रा. चंदेले, प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे, प्रा. रविकांत सर्पे, प्रा.राजू राठोड,ऍड. मिलिंद सर्पे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून श्रद्धांजली अर्पण केली.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते