Skip to main content

लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ ताबडतोब आर्थिक मदत मिळावी -किनवट भारतिय जनता पार्टी कडुन सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

(किनवट ता.प्रतिनिधी:) बारा बलुतेदारांचे लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेज ची घोषणा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी किनवट भाजपा च्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्तिकुमार पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आपण राज्यात लाडावून जाहीर केली आहे. या लॉकडाउन जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु नाही सुतार, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदार छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे आधीच गरीब परिस्थिती असलेल्या हा समाज लॉकडाऊन मुळे अधिक जास्त अडचणीत सापडलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आपण ,लॉकडाउन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक पॅकेज जाहीर केले. परंतु नाव्ही, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदारांसाठी कुठलीही आर्थिक सहायता जाहीर केलेली नाही तेव्हा बारा बलुतेदार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या बाराबलुतेदार मधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटुंब किमान 5 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.

या निवेदनावर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, जिल्हाध्यक्ष (ओबीसी) बाबुराव केंद्रे, शहराध्यक्ष फिरोज तवर , शहराध्यक्ष(ओबीसी) शिवा क्यातमवार, भाजपा (ओबीसी) आघाडी सरचिटणीस सुनील मच्छेवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...