किनवट ( प्रतिनिधी ) : कवितेत नवं लिहायचं असतं. अंतकरणाच्या मुशीतून जे येतं ते ज्वलंत काव्य असतं. बेंबीच्या देठापासून जोपर्यंत कालवाकालव होत नाही तोपर्यंत चांगली कविता सापडत नाही. अकारण कवितेच्या नादी लागायचं नाही. वृक्षावर आंबा फळ जेव्हा पाडाला येतो तेव्हा आपोआप देठ सोडून खाली पडतो तसं कवीतेचं असतं. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी केले. गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभाग्रहात प्रा. वंदना तामगाडगे यांच्या 'सखी जागी हो ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. त्या प्रसंगी हडसनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी गीतकार रविचंद्र हडसनकर होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके, बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे, नागसेनदादा सावदेकर आणि गौतम दामोदर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रमाता जीजाऊ, सावित्रीबाई फ
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com