किनवट ता. प्र.
नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील आदिवासी भागातील घोटी या गावी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक संध्या या नावाने दर रविवारी उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमध्ये विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळ स्पर्धा या प्रकारचे वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन करत आहे.हा उपक्रम 5 वी ते 12 पर्यंत सर्व विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात येत असून या रविवारी विद्यार्थांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळेस मार्गदर्शक म्हणून सोमा पाटील सर व सेवार्थ फाऊंडेशन चे ऋषिकेश लढे, तसेच गावातील काही तरुण हा उपक्रम राबविण्यासाठी मदत करत असलेले
प्रसेनजित कायपक, अनिकेत कायापक, रंजीत पाटील, नरेश गिमेकार, धममदिप तामगाडगे, रंजीत पाटील, अमन शेख, आशिष शेंडे इ. त्या दरम्यान उपस्थित होते...
Comments
Post a Comment