Skip to main content

नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे तर, कार्याध्यक्षपदी मिलिंद सर्पे यांची बिनविरोध निवड

 


नांदेड,दि.१७ :  नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे यांची,तर कार्याध्यक्षपदी पत्रकार मिलिंद सर्पे(किनवट) यांची एकमताने निवड करण्यात आली. 

   जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांची विस्तारित बैठक नांदेड येथे नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली. बिनविरोध निवडलेले संघटनेचे अन्य पदाधिकारी असे ; उपाध्यक्ष - डी. वाय.मिसाळ, गंगाधर जाधव, साईनाथ शिंदे  पाटील, माधव आठवले व रमाताई तिवारी, सरचिटणीस - राजाभाऊ कुलकर्णी, चिटणीस - विजय रावळे,शिवहर हिगमिरे,संदीप सरोदे व शिवाजी वाघमारॆ, संघटक - अभय मोरे, मारोती हनवंते,शेख लतीफ सलमान, प्रताप गजभारे व श्याम वाघमारे, कोषाअध्यक्ष - जगदेव पुयड,सदस्य - जयराम गोडबोले, अशोक जोंधळे, शिवाजी इंगोले, पांडुरंग शेजुळे,प्रभु तारु,पी,डी. मस्के, अजय तिवारी,उत्तम पावडे,डी.एच.गबाळे,राहुल मगरे व धनंजय माजंरमकर,मुख्यसल्लागार - अरुण दादा कांबळे, नाना पाटील क्षिरसागर,व्यंकटराव ठोके,पाडुंरग गोडबोले. 

मार्गदर्शक - दादाराव भुक्तरे व धर्माजी सावते.

      बैठकिस श्री. नवरे, जैतापूरकर, व्यंकटेश चन्नावार,आश्विन.बट्टु, बालाजी भोकरे,स्वप्निल ढोले, राजरतन चित्ते ,राहुल जाधव, सचिन चिटलमवार, निशा विजय सोनवणे,सुमन गजभारे, माला एस. प्रधान यांच्यासह अनेक रास्त भाव  दुकानदारांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...