Skip to main content

प्रा. वंदना तामगाडगे यांच्या ' सखी जागी हो ' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन !

किनवट ( प्रतिनिधी ) :

कवितेत नवं लिहायचं असतं. अंतकरणाच्या मुशीतून जे येतं ते ज्वलंत काव्य असतं. बेंबीच्या देठापासून जोपर्यंत कालवाकालव होत नाही तोपर्यंत चांगली कविता सापडत नाही. अकारण कवितेच्या नादी लागायचं नाही. वृक्षावर आंबा फळ जेव्हा पाडाला येतो तेव्हा आपोआप देठ सोडून खाली पडतो तसं कवीतेचं असतं. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी केले.

गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील मातोश्री कमलताई ठमके सभाग्रहात प्रा. वंदना तामगाडगे यांच्या 'सखी जागी हो ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. त्या प्रसंगी हडसनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी गीतकार रविचंद्र हडसनकर होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके, बळीराम पाटील महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पंजाब शेरे, नागसेनदादा सावदेकर आणि गौतम दामोदर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 


प्रारंभी राष्ट्रमाता जीजाऊ,  सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून शीलाताई शेलूकर यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती शेरे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा नरवाडे यांनी तर आभार माधुरी मुनेश्वर यांनी मानले. यावेळी प्रा.डा.पंजाब शेरे, प्राचार्या शुभांगीताई ठमके, गौतम दामोदर यांनी समयोचित विचार मांडले तर अध्यक्षिय समारोपप्रसंगी अभियंता प्रशांत ठमके यांनी कवयित्री प्रा.वंदना तामगाडगे यांचे अभिनंदन केले.


कार्यकमास संजय निवडूंगे , विजय कांबळे, प्राचार्य शेख हैदर, जे. एस. पठाण, प्रा.सुभाष राऊत, प्रा. आनंद सरतापे, प्रा. पंडित घुले, प्रा. गजानन सोनवणे, प्रमोद मुनेश्वर, रमाकांत गायकवाड, किशोर डांगे, नंदा नगारे, रेखा कानिंदे , वैशाली तामगाडगे, प्रज्ञा पाटील, चित्रा कुलकर्णी, नागसेन तामगाडगे, विकास तामगाडगे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे रुपेश मुनेश्वर, सुरेश पाटील, महेंद्र नरवाडे, राजा तामगाडगे, सुबोध सरपे, प्रकाशक रमेश मुनेश्वर यांच्यासह अंबाडी ,किनवट, गोकुंदा येथील बहुसंख्य काव्य रसिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला