Skip to main content

सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्याते प्रा. दगडु भरकड यांचा शिव जंयती निमित्त विशेष लेख



 जय जिजाऊ ..जय शिवराय..


कुळवाडी भूषण , रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .👏👏💐💐

अठरा पगड जातीतील व मुस्लीम  मावळ्यांना सोबत घेऊन बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी , समतेसाठी ,न्यायासाठी ,मानवतावादी विचारांने स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवरायांचे गुरु राजमाता जिजाऊ व वारकरी संप्रदायातील विज्ञानवादी संत तुकाराम महाराज होते .मुघलशाही ,आदिलशाही ,कुतुबशाही ,बरिदशाही ,निजामशाही ,इंग्रज ,फ्रेंच ,डच , पोर्तुगीज यांच्या व प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेच्या सर्व प्रकारच्या शोषणातून ,गुलामगिरीतून ,गोर-गरीब ,शेतकरी ,कष्टकरी , स्ञियांना मुक्त करण्यासाठी , न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्याचे आंदोलन उभारले  .त्यांचा लढा कोणत्याही जाती ,धर्माच्या विरोधात नव्होता तर तो मानवजातीच्या कल्याणासाठी होता . आपली रोजगार हमी योजना पिढ्यांपिढ्या चालावी .सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,धार्मिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात आपलीच मक्तेदारी असावी .यासाठी आपल्या सोईचा इतिहास लिहिला . राईचा पर्वत केला आणि पर्वताची राई केली .मध्ययुगीन कालखंडात सर्वच राज्यकर्त्यांसोबत ब्राम्हण होते .त्यांना शासनकर्ते कोण आहेत याचे काही देणेघेणे नव्होते .आपल्याला शासनात योग्य वाटा मिळाला ,पैसा मिळाला म्हणजे ते चांगले आणि ज्यांनी सत्याचा ,न्यायाचा मार्ग स्विकारला ते वाईट अशी त्यांची विचारधारा होती . मनुस्मृती सहिंतेप्रमाणे बहुजनास शिक्षणाचा अधिकार नसल्याने रामदास ,दादूकोंडदेव गुरू आम्हाला सांगितले ,लिहून ठेवले .अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला , शाहिस्तेखानाची बोटे तोडली , आग्रा येथे कैदेत असताना औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले .ऐवढाच मर्यादित इतिहास सांगून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो .छञपती शिवरायांनी स्वराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही हात लावायचा नाही .शेतकऱ्यांची फणसाची ,आंब्याची झाडे शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय तोडायचे नाही .कारण शेतकऱ्यांनी झाडाची काळजी आपल्या मुला प्रमाणे केलेली असते .लढाईच्या वेळेस पिकाची नुकसान होणार नाही ,घोड्यासाठी चारा लागल्यास मोबदला देऊन घ्यावा .शेतकऱ्यांना कर्ज देणारा ,नापिकी झाल्यास कर्ज माफ करणारा ,बियाणे ,खते औजारे देणारा रयतेची काळजी घेणारा ,लोकल्याणकारी  राजा छञपती शिवराय होते .

स्वराज्यातीलच नव्हेतर परराज्यातील स्ञियांचा आदर-सन्मान करणारे ,कोणी बदअमल केल्यास हात-पाय तोडून चौरंगा करणारे ,संत तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे परस्ञी माते समान मानत होते .छञपती शिवरायांनी मुस्लिम मावळ्यासाठी मस्जिद बांधली ,कुराणाची प्रत मिळाली तेव्हा आदरपूर्वक मुस्लिम मावळ्यास दिली .सैन्यात सरसेनापती नुरखान बेग ,वकील काझी हैदर ,अंगरक्षक सिद्दी इब्राहीम ,आरमार प्रमुख दर्या सारंग ,दौलतखान ,तोफखाना प्रमुख इब्राहिमखान , अफजलखान दगा फटका करणार आहे हे सांगणारा व वाघनखे बनवून देणारा रणदुल्लाखानाचा मुलगा रुस्तमेजमान ,आग्रा येथे सोबत असलेला मदारी मेहतर ,छञपती शिवरायांचे पहिले चिञ काढणारा मीर महमद , 1668 साली राजा हा किताब देणारा औरंगजेब बादशहा ,सातशे पठाण मावळ्यांची फौज होती हे सर्वधर्मसमभाव विचारांचे छञपती शिवाजी राजे होते .361गडकिल्ले बांधले-जिंकले कधी मुहूर्त बघितला नाही .अंधश्रद्धा बाळगली नाही .गडकिल्याचे बांधकाम करत असताना देवाची मुर्ती सापडली तेव्हा ती वितळवून त्याचा उपयोग शेतकरी व स्वराज्यासाठी केला हे विज्ञानवादी विचारांचे शिवराय सांगितले जात नाहीत .छञपती शिवराय निर्व्यसनी होते .आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही याचा आदर्श आजच्या तरुणांनी  घेतला पाहिजे .आमच्या इतिहास संशोधकानी खरा इतिहास समोर आणला त्या इतिहासाची पेरणी करण्याचे काम आपले आहे .

मनुवाद्दांनी आमच्या महापुरुषांचे कार्यकर्तृत्व संकुचित ,मर्यादित केले .त्यांना जाती-धर्मात बंदिस्त केले .आज आपणही स्वताला पुरोगामी ,अभ्यासक म्हणवून घेणारे त्यांचेच काम करत आहोत .महापुरुषांची जयंती जाती-धर्मानुसार करत आहोत . असे करणे हे महापुरुषांच्या विचार आणि कार्याच्या विरोधात आहे . दाढी-मिशा वाढवणे ,कपाळावर आडवे कुंकू लावणे ,कानात बाळी घालणे ,दोन चाकी ,चार चाकी गाडीवर राजे ,छञपती ,बघतोस काय मुजरा कर ,राजांचा फोटो लावणे ,जयंतीच्या दिवशी जयघोष करणे केवळ असे केल्याने आपण अनुयायी किंवा वारसदार ठरणार नाही . छञपती शिवरायांचे विचार सदैव आपल्यात असले पाहीजे .छञपती शिवाजी राजांची जयंती ही मनामनात ,घराघरातच नव्हे तर सदैव विचार आणि कृतीत असले पाहीजे .आपण बोलण्यापुरतेच त्यांचे वारसदार आहोत कृती माञ विरोधात करतो हे थांबविले पाहिजे .आज आपण स्वताला अभ्यासक ,प्रचार-प्रसारक समजतो पण कृती माञ विरोधात करतो .या छञपती शिवाजी राजांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे विचार सदैव कृतीत आणल्यासच खऱ्या अर्थाने जयंती निमित्त अभिवादन ठरेल .



प्रा.दगडू भरकड 

मराठा सेवा संघ , किनवट

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला