Skip to main content

Posts

Showing posts from December, 2025

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक महोत्सव समितीवर अमन कुंडगीर यांची नियुक्ती

 किनवट | प्रतिनिधी: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) राज्याभिषेक महोत्सव समिती, किल्ले वाफगाव यांच्या वतीने किनवट तालुका प्रतिनिधी म्हणून श्री. अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा आदेश समिती प्रमुख श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दिला. महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका पातळीवर समन्वय साधणे, जनसहभाग वाढविणे तसेच विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अमन कुंडगीर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अमन कुंडगीर यांच्या सामाजिक सहभागाचा आणि कार्याचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महोत्सव अधिक व्यापक आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल किनवट तालुक्यातून अमन कुंडगीर यांचे अभिनंदन होत असून, त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलसाठी अशोक वासाटे व दिलीप कोसले यांची निवड

  किनवट प्रतिनिधी/ राजेश पाटील-  दि. २,३,४,५ जानेवारी २०२६मध्ये होणाऱ्या पुणे येथील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल काव्य महोत्सवासाठी किनवट येथुन   शिव-फुले- शाहु- आंबेडकर  प्रबोधन चळवळीतील कवी गितकार अशोक वासाटे पहिले सत्राचे अध्यक्ष म्हणून तर दुसऱ्या सत्रात शाहीर  दिलीप कोसले यांची निवड करण्यात आली आहे. एस. एम. जोशी फौंडेशन पुणे सभागृहात पार पडणाऱ्या या महोत्सवासाठी आयोजक विजय वडवेराव आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान यांचे नुकतेच निवड पत्र प्राप्त झाले आहे . क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले, व क्रा.महात्मा जोतीबा फुले यांचे विचार समाजात रुजवुन संविधान जन जागृती गेल्या विस वर्षा पासून वासाटे व कोसले करत  आले आहेत त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दत्ता राठोड, गणेश शेवाळे, आत्मानंद सत्यवंश, चंद्रकांत दर्शनवाड, प्रकाश येरेकार, डॉ. लोमटे, डॉ. डोखळे, साहेबराव वाढवे, राजेश घोडाम, रामा सोनुले, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, दिलीप मुनेश्वर,गौतम कनिंदे, महेंद्र नरवाडे, उत्तम कनिंदे, अनिल उमरे सह परिसरातील साहित्यिक कवी गायक प्रेमींनी ...

साने गुरुजी मल्टीस्पेशालीटी रुग्णालयाचे थाटात उद्घाटन

  किनवट,दि.२४ : साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टीस्पेशालिटी विश्वस्त रुग्णालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त किनवट शहरात देश व राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व थोर मान्यवरांची प्रभावी उपस्थिती लाभली. या लोकार्पण सोहळ्यामुळे किनवटचा सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील मान अधिक उंचावला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, पद्मश्री नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉ. योगेंद्र वरडकर, डॉ. शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, एमआयडीसीचे कोठारे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सुहाना मसालेचे गिरीश क्षीरसागर तसेच व्यंकटेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आदरातिथ्य किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांनी नगराध्यक्षा या नात्याने केले, तर युवा नेते करण येंड्रलवार यांनी संयोजनात सक्रिय सहभाग घेतला. या रुग्णालयाच्या माध्यमात...

रमेश मुनेश्वर व रुपेश मुनेश्वर या शिक्षक बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  किनवट प्रतिनिधी:  लातूर येथे संपन्न झालेल्या शिक्षक , कर्मचारी व अधिकारी विभागीय स्पर्धेत रमेश मुनेश्वर यांनी एकपात्री अभिनय व रूपेश मुनेश्वर यांनी स्वरचित काव्य सादरकीरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातील या दोन शिक्षक  बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने दयानंद महविद्यालय , लातूर येथे शिक्षक , कर्मचारी व  अधिकारी यांच्या विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना यात सहभागाची संधी होती. यावेळी भूमिका अभिनय या क्षेत्रातील व्यसनाधीनतेवर मात या विषयावर तालुक्यातील शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी ( चि ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी 'मी हरलो होतो पण जिंकलो '  ही  एकपात्री नाटिका सादरकरून आणि स्वलिखित काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक ...

किनवटमध्ये सुजाता एंड्रलवार यांचा ऐतिहासिक विजय...

  किनवटमध्ये सुजाता एंड्रलवार यांचा ऐतिहासिक विजय... राजेश पाटील/ किनवट (प्रतिनिधी) किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा रणसंग्राम अखेर आज संपुष्टात आले.  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सुजाता विनोद एंड्रलवार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना हरवत १०,४७३ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला.  त्यांनी भाजपाच्या उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार यांचा ३,९९६ मतांच्या फरकाने पराभव केला. आज रविवारी पार पडलेल्या मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सुजाता यंडूलवार यांनी आघाडी कायम ठेवली होती. निवडणुकीच्या निकालामुळे शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, नवीन राजकीय समीकरणे अधोरेखित झाली आहेत. नगराध्यक्षपद : कोणाला किती मते? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण १९,००८ वैध मते नोंदवली गेली. मतदारांनी सुजाता यंन्ड्रलवार यांच्या पारड्यात कौल दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.  सुजाता विनोद यंन्ड्रलवार (शिवसेना उबाठा): १०,४७३ (विजयी), पुष्पा आनंद मच्छेवार(भाजपा) ,६,४७७,काजी राहत तबस्सुम (AIMIM): ८६२...

अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्यच्या किनवट तालुका अध्यक्षपदी राजेश पाटील यांची नियुक्ती

   किनवट प्रतिनिधी: अवघ्या महाराष्ट्रात साहित्य चळवळ राबवत असलेली व नवोदीत साहित्यिक कवी लेखकाच्या कार्याची दखल घेणारी संस्था म्हणजे अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य याच संस्थेने आदिवासी दुर्गम भागातील कला साहित्य वाचन, पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या  राजेश पाटील या युवकास अक्षरोदय साहित्य मंडळच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिली असून  समिती मंडळाच्या वतीने निवडपत्र पाठवले आहे. सदरील पत्रावर राज्याध्यक्ष सौ.सिंधुताई दहिफळे, कार्याध्यक्ष सदानंदजी सपकाळे, सचिव नरेंद्र धोंगडे , सहसचिव चंद्रकांत चव्हाण, कोषाध्यक्ष उषाताई ठाकुर, बालीका बरगळ, माया तळणकर, पंकज कांबळे, अविष्कार शिंदे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत या नियुक्तीमुळे किनवट तालुक्यातील साहित्य क्षेत्रात नव चैतन्य निर्माण झाले असुन राजेश पाटील यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साहित्य वाचन संस्कृती क्षेत्रात राजेश पाटिल यांनी जे योगदान दिले त्या बद्दल त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांनी तेलंगणासहीत विविध जिल्ह्यांतील ,साहित्य संमेलन, व्यसनमुक्तीसाठी कार्य, पर्यावरण जागृती, कार्यशाळा,स्...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

निवासी मुकबधीर विद्यालयात अजय कदम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

किनवट : येथील निवासी मूकबधिर विद्यालयात आज (ता. १३) विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. युवासेना तालुकाप्रमुख   अजय कदम पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थ्यांना   वही, पेन तसेच खाऊचे वाटप   करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शैक्षणिक साहित्यामुळे त्यांच्या दैनंदिन अभ्यासाला मदत होणार असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने ठेवण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तसेच युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनीच अजय कदम पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांतून समाजातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आधार व प्रोत्साहन मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिलवंत येरेकार यांचे सामाजिक योगदान ..संविधान दिना निमित्त केली महापुरुषाच्या पुतळ्याची साफ सफाई

  किनवट ता. प्रतिनिधी: किनवट शहरातील डॉ. बाबा साहेब आंबेडकर पुतळा परिसर, महात्मा फुले चौक पुतळा  परिसर, अशोक स्तंभ, सविधांन स्तंभ परिसर अशा परिसरामध्ये शिलवंत येरेकार यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून त्यांनी पुतळ्याची व स्मारकाची पाण्याने स्वच्छ धुवून साफ सफाई केली त्यांचे सामाजिक कार्य सर्वांना परिचित आहे. त्यांनी कवीता लेखन, ललीत लेखन, पर्यटन प्रवास वर्णन तथा अन्य सामाजिक कार्यात त्यांना रस आहे त्यांनी अनेक वर्षा पासुन स्वच्छता व लेखन हे काम करत आले आहेत म्हणून त्यांनी यदाही आपले सहकारी सुनिल पाटील यांच्या सोबत संविधान दिना निमित्त परिसरातील घान साफ करून पुतळे धुतले व स्वच्छ केले त्यांच्या या कार्याची किनवट परिसरात चर्चा सुरू असून त्यांचे कौतुक होत आहे तसेच भारतिय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके व सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी त्यांच्या या कामा बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

संविधान निर्मात्यांनी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली -प्राचार्य डॉ. सुभाष गवई

  किनवट : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली आहे. ह्यानुसार सर्व समान आहेत. सर्वांना समतेचा अधिकार आहे. सर्वांना एकसारखा कायदा लागू आहे. संविधानाने भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले पण यामुळे स्वैराचाराला मुभा नाही. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले परंतु इतर धर्माचा आदर करायला सांगितले. या देशाला राष्ट्र करायचे आहे तर ह्या देशाला धर्मनिरपेक्ष , जातीविरहीत केलं पाहिजे. असे प्रतिपादन विदर्भ महारोगी सेवामंडळ , तपोवन अमरावतीचे अध्यक्ष कुष्ठ सेवाकर्मी , संविधानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले.          ते येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा " या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीस 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत प्रत्येक शाळेत गावात...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर

  किनवट :    समता, बंधुता व न्याय यांचा संदेश देणारे भारतीय संविधान निर्माता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘युवा पॅंथर’ तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २६/११ मुंबई आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्याचा अभिनव उपक्रम यंदा राबविण्यात येत आहे. हे शिबीर शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, किनवट येथे आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “रक्तदान म्हणजे जीवनदान” या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाला रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजक अॅड. सम्राट सर्पे आणि निखिल वि. कावळे असून समस्त आंबेडकरप्रेमी किनवट यांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शिबीरासंदर्भात अधिक माहितीसाठी 8668700748, 8975630290, 7588430296, 7770059459 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन आणि शहीद जवानांना ...

किनवट मध्ये १९००८ मतदांरानी बजावला मतदानाचा हक्क

(किनवट ता. प्रतिनिधी)  नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५करिता मंगळवारी (ता.२ )२९मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून अध्यक्षपदासाठी ८व सदस्यपदांसाठीच्या ९०उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदवले आहे.       पुरुष १२३३४ , स्त्री १३२५६व  ईतर ०३ असे एकूण  २५५९३ मतदार नगर परिषदेच्या १० प्रभागात आहेत. सकाळी ६.३०वाजता अभिरूप मतदान ( मॉकपोलच्या) व ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाच्या  वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात दोष आढळल्याने तिथे राखीव मतदान यंत्र वापरले . सकाळी ७.३० ते ९.३०दरम्यान ५.६१% , सकाळी ७.४० ते ११.३०दरम्यान १५.५१% , सकाळी ७.३० ते दुपारी १.३० दरम्यान २९.१८% , सकाळी ७.३० ते दुपारी ३.३०दरम्यान ४६.२१% . तीन मतदान केंद्रावर ५.३० वाजता ७४.२७ % मतदान झाले. सकाळी धिम्या गतीने मतदानास प्रारंभ झाला. दुपारनंतर मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र बहुतांशी मतदान केंद्रावर दिसले.  तहसिलदार तथा  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसि...

नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला

  मुंबई :- राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.       दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. पण, आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.       निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे.