Skip to main content

किनवटमध्ये सुजाता एंड्रलवार यांचा ऐतिहासिक विजय...

 


किनवटमध्ये सुजाता एंड्रलवार यांचा ऐतिहासिक विजय...




राजेश पाटील/ किनवट (प्रतिनिधी)


किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा रणसंग्राम अखेर आज संपुष्टात आले.

 संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सुजाता विनोद एंड्रलवार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांना हरवत १०,४७३ मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला. 

त्यांनी भाजपाच्या उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार यांचा ३,९९६ मतांच्या फरकाने पराभव केला. आज रविवारी पार पडलेल्या मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सुजाता यंडूलवार यांनी आघाडी कायम ठेवली होती. निवडणुकीच्या



निकालामुळे शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, नवीन राजकीय समीकरणे अधोरेखित झाली आहेत. नगराध्यक्षपद : कोणाला किती मते? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण १९,००८ वैध मते नोंदवली गेली. मतदारांनी सुजाता यंन्ड्रलवार यांच्या पारड्यात कौल दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.  सुजाता विनोद यंन्ड्रलवार (शिवसेना उबाठा): १०,४७३ (विजयी), पुष्पा आनंद मच्छेवार(भाजपा) ,६,४७७,काजी राहत तबस्सुम (AIMIM): ८६२  /,शेख तयबाबेगम

(भाराकाँ): ४१८ 

नोटा): ९९ प्रभागनिहाय विजयी उमेदवार :


कुणी मारली बाजी ? नगरपरिषदेच्या विविध

प्रभागांत संमिश्र निकाल पाहायला मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही अनेक जागांवर यश मिळवले आहे.  विश्लेषण राजकीय या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग १ मध्ये ब,५ अ आणि ७ अ  अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांच्याउमेदवारांना धक्का देत विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी सुजाता यंड्रलवार यांची निवड झाल्याने आता शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




◼️" जनता जनार्दनाचा विश्वास सार्थ ठरणार "


"आमच्यावर विश्वास ठेवून माझ्या मातोश्री सौ. सुजाता विनोद एंन्ड्रलवार यांना किनवटच्या जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी निवडून देत नगराध्यक्षपदी विराजमान केले आहे. किनवट शहरवासीयांचे हे ऋण मी शहराचा कायापालट करून आणि उत्तम मूलभूत सुविधा देऊन फेडणार आहे. जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.


जनतेची सेवा हेच माझे अंतिम ध्येय आहे."

करण एन्ड्रलवार 

(युवा नेतृत्व, किनवट)




◼️(किनवट पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन)


निवडणूक निकाला


नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक गणेश कन्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य चौकाचौकांत पोलीस फौजफाटा तैनात होता. अत्यंत संवेदनशील वातावरणातही मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली, ज्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले.


◼️(प्रभाग :विजयी उमेदवार। पक्ष / गट)


।। १ अ । संतोष किशनराव मरस्कोल्हे। भाजपा


॥ १ ब । प्रिती धीरज नेम्माणीवार। अपक्ष


॥ २ अ। अश्विनी आदर्श जागरलावार NCP (SP)


॥ २ ब । मोहम्मद हसन पठाण (NCP) 1


। ३ अ। निलोफर निसार भाटी। शिवसेना (उबाठा)


॥ ३ ब। श्रीराम नारायणराव नेम्माणीवार । शिवसेना (उबाठा)


॥ ४ अ। अभय मधुकर नगराळे । NCP


॥ ४ ब। नुरसबा मुकद्दर शेख । NCP


।। ५ अ। चंद्रशेखर रंगराव नेम्माणीवार। अपक्ष


।। ५ ब । निकीता स्वागत आयनेनिवार । भाजपा


।। ६अ। प्रविण इंद्रसिंग राठोड । NCP (SP)


।। ६ ब। सरोजिनी बाबूराव ओडीवार। भाजपा


।। ७ अ । ललिताबाई मारोती मुनेश्वर । अपक्ष


।। ७ ब । श्रीनिवास किशनराव नेम्माणीवार । भाजपा


।। ८ अ । गंगाबाई नारायणराव कोल्हे। शिवसेना (उबाठा)


।। ८ ब । सुरज किशनराव सातुरवार । शिवसेना


।। ९. अ । सादिका इम्रान शेख ।


॥ ९ ब । नईमाबेगम मिर्झा सईद । NCP (SP)


।। १० अ । अभय भिमराव महाजन NCP (SP)


।। १० ब । गुलबखत अकबर खान । NCP


॥ १० क। जरीना खानम साजिद खान। NCP ।





Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...