Skip to main content

संविधान निर्मात्यांनी भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली -प्राचार्य डॉ. सुभाष गवई

 


किनवट : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली आहे. ह्यानुसार सर्व समान आहेत. सर्वांना समतेचा अधिकार आहे. सर्वांना एकसारखा कायदा लागू आहे. संविधानाने भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले पण यामुळे स्वैराचाराला मुभा नाही. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले परंतु इतर धर्माचा आदर करायला सांगितले. या देशाला राष्ट्र करायचे आहे तर ह्या देशाला धर्मनिरपेक्ष , जातीविरहीत केलं पाहिजे. असे प्रतिपादन विदर्भ महारोगी सेवामंडळ , तपोवन अमरावतीचे अध्यक्ष कुष्ठ सेवाकर्मी , संविधानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले.

         ते येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा " या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीस 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत प्रत्येक शाळेत गावात राबवून संविधानाबद्दल जनजागृती, प्रभात फेरी, विविध स्पर्धा तसेच व्याख्यान यांचे आयोजन करावे. ह्या शासननिर्णयानुसार हे व्याख्यान आयोजित केले होते.

     याप्रसंगी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, ऍड. विक्रांत गवई, संस्थेच्या कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके व डॉ. मोना गवई  या मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

     पुढे बोलतांना डॉ. गवई म्हणाले की, मानवी हक्काची सनद संयुक्त राष्ट्र संघाने 1948 मध्ये स्विकारली. पण 1949 राजकीय लोकशाही मिळाली. डॉ. बाबासाहेबांनी 1946 पासुनच तथागत बुद्धांच्या विचारातून ही लोकशाही आणली. ती इतर देशातून घेतली नाही. संविधानात लिंगभेदाला थारा नाही. परंतु आजही मुलीं-मुलांमध्ये फरक केल्या जातो. मुलींना , महिलांना शिक्षणाची मुभा दिली परंतु त्यांना स्वतंत्र विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. भगवान बुद्ध , महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार दिला होता. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाज व्यवस्थेला बदलण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. म्हणून सर्वांनी प्रगल्भ व्हावे.

     शुभांगी बेद्रे या विद्यार्थिनीचे प्रास्ताविक भाषण झाले. पाहुण्यांचा परिचर वैशाली साबळे-नरवाडे यांनी करून दिला. पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. उप प्राचार्य राधेश्याम जाधव यांनी आभार मानले.

        प्रारंभी फर्स्ट ऑफिसर डी.एस.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. 52 महाराष्ट्र बटालियनच्या पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उप मुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक  रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकूंद मुनेश्वर यांचेसह सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संविधान उद्देशिका सामुहीक वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.