Skip to main content

अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्यच्या किनवट तालुका अध्यक्षपदी राजेश पाटील यांची नियुक्ती

 



 किनवट प्रतिनिधी:

अवघ्या महाराष्ट्रात साहित्य चळवळ राबवत असलेली व नवोदीत साहित्यिक कवी लेखकाच्या कार्याची दखल घेणारी संस्था म्हणजे अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य याच संस्थेने आदिवासी दुर्गम भागातील कला साहित्य वाचन, पत्रकारीता क्षेत्रात काम करणाऱ्या  राजेश पाटील या युवकास अक्षरोदय साहित्य मंडळच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिली असून  समिती मंडळाच्या वतीने निवडपत्र पाठवले आहे.

सदरील पत्रावर राज्याध्यक्ष सौ.सिंधुताई दहिफळे, कार्याध्यक्ष सदानंदजी सपकाळे, सचिव नरेंद्र धोंगडे , सहसचिव चंद्रकांत चव्हाण, कोषाध्यक्ष उषाताई ठाकुर, बालीका बरगळ, माया तळणकर, पंकज कांबळे, अविष्कार शिंदे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत या नियुक्तीमुळे किनवट तालुक्यातील साहित्य क्षेत्रात नव चैतन्य निर्माण झाले असुन राजेश पाटील यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साहित्य वाचन संस्कृती क्षेत्रात राजेश पाटिल यांनी जे योगदान दिले त्या बद्दल त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 त्यांनी तेलंगणासहीत विविध जिल्ह्यांतील ,साहित्य संमेलन, व्यसनमुक्तीसाठी कार्य, पर्यावरण जागृती, कार्यशाळा,स्वारतिमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात कवी मार्गदर्शक म्हणून सहभागी  झाले आहेत, तसेच जागतिक धम्म परिषदेत कवी म्हणून त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे , तसेच किनवट तालुक्यातील , शाळा, महाविद्यालयात कवी लेखक म्हणून अनेकदा प्रमुख उपस्थिती लावली आहे

त्यांचे अनेक कविता , लेख विविध पुस्तकात, प्रातिनिधिक संग्रहात , वर्तमान पत्रात प्रकाशित झालेले आहेत तसेच  दैनिक लोकशक्तीचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत  आहेत .

निवडी बद्दल परिवार, ॲड. मिलींद सर्पे, शकील बडगुजर, गोकुळ भवरे, आनंद भालेराव,साजीद बडगुजर शिलरत्न पाटील, संतोष सिसले, सय्यद नदीम, नसीर तगाले, शेख अतिफ, राज माहुरकर,ॲड. सचिन दारवंडे , क्रांतिसुर्यचे रमेश मुनेश्वर, उपप्राचार्य पंजाब शेरे, उत्तम कानिंदे, प्रा. गजानन सोनोने, कवी महेंद्र नरवाडे, मारोती देवकते, प्रविण वावळे, संजय नरवाडे, अविनाश ठमके,प्रफुल आढागळे, सतिश कऱ्हाळे, अरुण घुले, संतोष पहुरकर सम्यक सर्पे, दिपक जाधव , किशन गेडाम, शिवा सिडाम, गजाजन बावणे, प्रितम सिरमनवार  , पत्रकार , वकील मित्र सर्व स्तरातुन  अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...