Skip to main content

रमेश मुनेश्वर व रुपेश मुनेश्वर या शिक्षक बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 


किनवट प्रतिनिधी:

 लातूर येथे संपन्न झालेल्या शिक्षक , कर्मचारी व अधिकारी विभागीय स्पर्धेत रमेश मुनेश्वर यांनी एकपात्री अभिनय व रूपेश मुनेश्वर यांनी स्वरचित काव्य सादरकीरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याने तालुक्यातील या दोन शिक्षक  बंधूची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याने सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने दयानंद महविद्यालय , लातूर येथे शिक्षक , कर्मचारी व  अधिकारी यांच्या विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांना यात सहभागाची संधी होती. यावेळी भूमिका अभिनय या क्षेत्रातील व्यसनाधीनतेवर मात या विषयावर तालुक्यातील शनिवारपेठ केंद्रातील दरसांगवी ( चि ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी 'मी हरलो होतो पण जिंकलो '  ही  एकपात्री नाटिका सादरकरून आणि स्वलिखित काव्य लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत मोहपूर केंद्रातील लक्कडकोट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक रुपेश माधवराव मुनेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारी ' शेतकरी बाप ' ही कविता बहारदार सादर करून विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. 

    



या शिक्षक बंधूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल डायटचे प्राचार्य अमोल निळेकर जिल्हा परिषद, नांदेडच्या शिक्षणाधिकारी (प्रा) वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (यो) दिलीपकुमार बनसोडे, किनवट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर जम्पलवाड, मनिषा बडगीरे, केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे, राम बुसमवार, पद्माकर कवटीकवार, रमेश राठोड, रमेश खूपसे, विजय मडावी, राजेश्वर जोशी, चंद्रकांत मोरे, सुरेश पाटील, शेषराव पाटील, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे आदी मान्यवरांसह बहुसंख्य शिक्षक बंधू-भगिनिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.